HW News Marathi
मुंबई

आझाद मैदान येथे माथाडी कामगारांचे बेमुदत उपोषण

मुंबई | राज्य शासनाच्या कामगार, पणन व सहकार, उद्योग व अन्य खात्याअंतर्गत माथाडी कामगारांशी संबंधित प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून माथाडी कामगारांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आज आझाद मैदान येथे माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र पाटील यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे. माथाडी बोर्डाच्या टोळीचे मुकादम आणि उपमुकादम व कार्यकर्त्यांच्या नवी मुंबई येथील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. अनुभवी प्रमुख कामगार नेत्यांना समितीवर सदस्य म्हणून नेमून माथाडी कामगारांसाठी सल्लागार समितीची पुनर्रचना करावी ही मागणी शासनाकडे अद्याप प्रलंबित आहे.

शासनाने राज्यातील ३६ माथाडी मंडळांचे एकच माथाडी मंडळ करण्याच्या घोषणेला सर्वच माथाडी कामगार संघटनांनी कडाडून विरोध केला होता. आश्वासन देणाऱ्या सरकारने अद्याप एकच मंडळ करण्याचा निर्णय डावलला नसल्यामुळे कामगार संघटनांमधून तीव्र नाराजी व्यक्त करत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे तसेच शासनाने लवकरच माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवून मंडळावर पूर्णवेळ अध्यक्ष व सचिवाची नेमणूक करावी . माथाडी कायदा व कामगारांचे हित डावलणारे निर्णय रद्द केले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

कापडी पिशव्यासाठी पालिकेला ५ कोटी रुपये निधी देणार

News Desk

“जिथे विषय गंभीर, तिथे राज साहेब खंबीर”…! राज ठाकरे १३ तारखेला रत्नागिरीच्या दौऱ्यावर

Adil

ठाणे महावितरणच्या गलथान कारभाराच्या विरोधात आंदोलन

News Desk
मुंबई

भाजपच्या ‘आश्वासनाचा फुगा’ जनताच फोडेल

News Desk

भाजपच्या आश्वासनाचा फुगा जनताच फोडेल

मुंबई छत्रपतीं का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ असे निवडणुक काळात ब्रीदवाक्य घेत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या स्मारकाची एकही वीट रचली नाही याचाच अर्थ हे सरकार भूलथापा देवून आपली पोळी भाजून घेण्यात यशस्वी झाले आहे. परंतु हा भूलथापांचा फुगा येत्या काळात जनताच फोडेल असा माझा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रामध्ये जाऊन पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले आणि इंदू मीलमध्ये जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजनही केले. महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी या दोन महापुरुषांच्या स्मारकांचा मुद्दा भाजपाने घेतला आणि सत्तेतही आले. परंतु या सरकारने सत्तेत येताना महापुरुषांच्या स्मारकांना जेवढया पध्दतीने महत्व दिले तेवढे महत्व सत्तेत आल्यावर दिलेले नाही. एकीकडे महाराजांच्या नावाने सत्तेत यायचे आणि दुसरीकडे त्यांच्या स्मारकाची वीटही रचायची नाही हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान सरकारने केला आहे. निवडणूक काळामध्ये दिलेली आश्वासने या फक्त भूलथापाच होत्या हे आता जनतेच्या लक्षात आले आहे असा आरोपही मलिक यांनी केलाय.

Related posts

 पेट्रोल-डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेची पोस्टरबाजी

swarit

महिला पदाधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी धारावी भाजप अध्यक्षावर गुन्हा दाखल

Gauri Tilekar

धारावीतील निर्माणाधीन इमारतीचा भाग कोसळून १ मृत्यू, ३ जण जखमी

News Desk