HW News Marathi
मुंबई

“जिथे विषय गंभीर, तिथे राज साहेब खंबीर”…! राज ठाकरे १३ तारखेला रत्नागिरीच्या दौऱ्यावर

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे करणार रत्नागिरीचा दौरा करणार आहेत. येथील नाणार प्रकल्पाचा वाद चांगलाच पेटला असून ते यावर आपली भूमिका मांडणार आहेत.

येत्या १३ तारखेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे रत्नागिरीतील नाणारला भेट देणार आहेत. इथे ते स्थनिक ग्रामस्थाशी संवाद साधणार आहेत. नाणार ग्रामस्थांचा रिफायनरी प्रकल्पाला विरोध असून त्यांची मते राज ठाकरे जाणून घेणार आहेत. त्यानंतर प्रकल्पाबाबत ठाकरे आपली भूमिका जाहीर करण्याची शक्यता आहे.

आशियातील मोठा प्रकल्प

राजापूर तालुक्यातील नाणार परीसरात आशिया खंडातील सर्वाधिक मोठा रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. मात्र या प्रकल्पाच्या विरोधात मोठं जनआंदोलन उभं राहिलं आहे. त्यातच या प्रकल्पासंदर्भात विनायक राऊत यांनी एक धक्कादायक आरोप सरकारवर केल्याने खळबळ उडाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रेल्वेचे ट्रॅकमन करतायत अधिकाऱ्यांची सेवा!

News Desk

मुंबईतील सभेत ओवैसींवर चप्पल फेकली

News Desk

पोद्दार रुग्णालयातील गैरसोय झालेल्या रुग्णांची आदित्य ठाकरेंनी मागितली माफी

News Desk