HW News Marathi
देश / विदेश

प्रमोद मुतालिक यांनी केली गौरी लंकेश यांची कुत्र्यांशी तुलना

मुंबई | काँग्रेसच्या काळात कर्नाटक आणि महाराष्ट्रात प्रत्येकी २ हत्या झाल्या होत्या. तेव्हा काँग्रेस सरकार शांत होते. त्यावेळी मात्र कोणीही काँग्रेसला प्रश्न विचारला नाही. परंतु गौरी लंकेश यांच्या मृत्यूनंतर मोदी गप्प का? असा सवाल सर्वजण उपस्थित करत आहेत. पंतप्रधान मोदींनी या बद्दल का बोलावे ? म्हणजे कर्नाटकात एखाद्या कुत्र्याचा मृत्यू झाला, तर त्यावर मोदींनी प्रतिक्रिया द्यावी, अशी अपेक्षा तुम्ही का करता ?, असे वादग्रस्त विधान श्रीराम सेनेचे प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी केले आहे.

५ सप्टेंबर २०१७ रोजी परशुराम वाघमारे याने गौरी लंकेश यांच्यावर चार गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. गौरी लंकेश यांच्या हत्ये प्रकरणी कर्नाटकच्या एसआयटीने महाराष्ट्रातून परशुराम वाघमारे याला अटक केली आहे. धर्माच्या रक्षणासाठी पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केल्याची कबुली परशुरामने दिली असल्याचा दावा कर्नाटकच्या एसआयटीने केला आहे.

संबंधित बातम्या – धर्माच्या रक्षणासाठी गौरी लंकेश यांची हत्या

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प चीनवर नाराज

News Desk

छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान होऊनही भाजपचे तोंड बंद !

News Desk

मध्य प्रदेशचे राज्यपाल आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालजी टंडन यांचे निधन

News Desk
महाराष्ट्र

येत्या २४ तासात मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊसचा इशारा

News Desk

मुंबई | मुंबई, ठाणे आणि कोकणात येत्या २४ तासात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. जूनच्या पहिल्याच आवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली. परंतु आठवडाभर पावस थांबल्यानंतर पावसाने रविवारी पुन्हा एकदा दमदार एन्ट्री केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी सुखावला आहे.

रविवारी कोकण, गोव्यात बहुतांश ठिकाणी आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. तर मराठवाड्यात तुरळक पाऊस पडला. रायगडमध्ये रविवारी सकाळपासून सुरुवात झाली आहे. संपूर्ण जिल्ह्यात ३३४ मि.मी. पावसाची नोंदी झाली आहे. तर ठाणे शहरात २०५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

Related posts

सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा – भीमा कोरेगाव प्रकरणातील दोषींवर कारवाईची मागणी

News Desk

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना जामीन मंजूर

News Desk

महाराष्ट्रातील केंद्रातील मंत्र्यांनी मोदींच्या सहीचा २ हजार कोटींचा चेक घेऊन यावा!

News Desk