HW News Marathi
महाराष्ट्र

महाराष्ट्रातील आमदारांचा वेतन, महागाई भत्ता जाणून घ्या

मुंबई : महाराष्ट्रातील जनतेची सेवा करणाऱ्या आमदार यांना किती पगार आहे. हे जाणून घेणयासाठी आपण सर्वजण उत्साहित आहोत. महाराष्ट्र सरकारने २०१८ या वर्षाच्या कालावधीत आमदारांवर किती पैसे खर्च केले आहेत. या सर्व खर्चाची माहिती ठाण्यातील आरटीआय कार्यकर्ते प्राजक्त झावरे-पाटील यांनी महाराष्ट्र विधानमंडळाकडून ही माहितीच्या अधिकारा अंतर्गत अर्ज करुन ही धक्कादायक माहिती मिळाली आहे.

महाराष्ट्रातील आमदारांना एकूण पगार, मूळ पगार, महागाई भत्ता आणि इतर भत्ते यांची सर्व माहिती मिळवली आहे. महाराष्ट्रातील आमदारांना प्रत्येक महिन्यात ६७,००० रुपये हा त्यांचा मूळ पगार आहे. महाराष्ट्रातील सामान्य जनता महागाईत होरपळून निघत आहे. परंतु महाराष्ट्रातील आमदारांना मात्र महागाई भत्ता ९१,१२० रुपये मिळतो. आता सर्व आमदारांकडे स्मार्टफोन असून देखील त्यांना जुन्या काळाप्रमाणे दूरध्वनीसाठी महाराष्ट्र सरकार ८,००० रुपये मिळत आहे.

२१व्या शतकात सर्वजण ई-मेलचा वापर करत असताना. परंतु इतिहास जमा झालेल्या टपाल सेवेसाठी सुद्ध सरकार दरमहिना १०,००० रुपये देते. संगणक चालकांच्या सेवेसाठी १०,००० रुपये मिळतात. तर महाराष्ट्रातील आमदारांना एकूण १,८६,१२० रुपये खर्च केले जातात. महागाई भत्ता, टपाल सेवा आणि दूरध्वनी यासाठी खर्च करण्यात येणाऱ्या पैसांवर अनेक सवाल उपस्थित राहिले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दिवाळीत लोडशेडींगला सुट्टी 

News Desk

मुंबई महापालिकेने केलेली कारवाई महापालिकेच्या नियमानुसारच केली – किशोरी पेडणेकर

News Desk

‘माझा दौऱ्यादरम्यान जिल्हाधिकारींनी मला भेटणे अपेक्षित होते’, – भारती पवार

News Desk
देश / विदेश

पंजाबमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी, राज्यात हाय अलर्ट

News Desk

पंजाब | जम्मू-काश्मीरच्या मार्गाने ४ ते ५ दहशतवादी पंजाबमध्ये घुसखोरी केल्याची माहिती केंद्रीय गृह मंत्रालयला मिळाली आहे. ही माहिती मिळताच पंजाब सरकारने राज्यात हाय अलर्ट जारी केला आहे. हे दहशतवादी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयच्या सांगण्यावरुन दहशतवाद पसरवण्यासाठी घुसले असल्याची माहिती सरकारला मिळाली आहे.

या संदर्भात पंजाब पोलिसांनी संवेदनशील ठिकाणांची पाहणी करुन त्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त केला असून मशीद आणि दर्गा येथे देखील पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाला मिळालेल्या माहितीनुसार ईदच्या निमित्ताने पंजाबमध्ये मोठा दहशवादी कारवाय करण्याचा त्यांचा कट असल्याचे कळते. हे दहशतवादी काश्मीरच्या मार्गाने पंजाबमध्ये घुसले असून दहशतवादी कोणत्याही मशीद आणि दर्गामध्ये शरण घेऊ शकतात. त्यामुळे राज्याची सुरक्षा लक्ष्यात घेऊन हाय अलर्ट जारी केल्याची माहिती पंजाब सरकारने दिली आहे.

दहशतवादींनी घुसखोरी केल्याची माहिती मिळताच राज्यातील हॉटेल आणि गेस्ट हाउस या ठिकाणींची पाहणी पंजाब पोलीस करत आहेत. पाकिस्तानकडून गोळीबार सुरु असताना हे दहशतवादी काश्मीर मार्गाने भारतात घुसल्याची माहिती गृह मंत्रलयाला मिळाली आहे. पाक नेहमीच गोळीबार करताना त्यांचे दहशतवादी भारतात घुसखोरी करतात. ईदच्या निमित्ताने राज्यात कोणताही अनुचित प्रकरा घडू नये म्हणून मशीद आणि दर्गा या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याची माहिती पंजाबचे एसएसपी नवीन सिंगल यांनी ही माहिती दिली आहे.

Related posts

गंगेचे पावित्र्य राखण्यासाठी कठोर नियम

News Desk

#CoronaVirus : घाबरून युद्ध जिंकता येत नाही, आपण जिद्दीने लढू !

swarit

…मग राजीव गांधींची हत्या देखील अपघातच होता का ?

News Desk