HW News Marathi
महाराष्ट्र

दिवाळीत लोडशेडींगला सुट्टी 

मुंबई – लोडशेडींग मुळे संपूर्ण राज्याला आंधाराचा सामना करावा लागणाऱ्यांना काही काळ दिलासा मिळणार आहे. दिवाळी मध्ये राज्यात कुठेही लोडशेडींग होणार नसल्याचा दावा ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. राज्यात जे लोडशेडींग होते ते तात्पूरते होते. कोळसा टंचाई मुळे ही स्थिती उद्भवली होती. त्याचा वीज निर्मितीवर परिणाम झाला होता. मात्र आता ही स्थिती नियंत्रणात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे दिवाळीत राज्यातील प्रत्येक घरात प्रकाश असेल असेही त्यांनी सांगितले.

राज्याला आवश्यक असणारा कोळसा सध्या उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले. गेल्या तीन वर्षांत राज्यातील लोडशेडिंग बंद आहे आणि पुढेही ते बंद राहील असेही त्यांनी सांगितले. शेतीसाठी सलग ८ तास तर गावांसाठी २४ तास पुरवली जाते तीच स्थिती यापुढच्याही काळात असेल. त्यामुळे दिवाळीत कोणालाही लोडशेडींगचा सामना करावा लागणार नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘१२ आमदारांच्या यादीवर तोंडावर मास्क ठेवलेलचं बरं, पण आमदारकी मिळाली तर आनंदच – मातोंडकर

News Desk

मंत्री धनंजय मुंडे CSMT स्थानकावर हमाल मंडळींशी गप्पा मारण्यात रमतात तेव्हा…!

News Desk

5वी आणि 8वीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली नवी तारीख जाहीर…!

News Desk