HW News Marathi
राजकारण

मोदी सरकारने नोटबंदी करून मुंबईकरांवर आक्रमण केलं

मुंबई | देशात महा आघाडी करणे ही केवळ विरोधी पक्षांचीच नाही तर देशातील लोकांची भावना झाली आहे. अनेक पक्ष या महा आघाडीत जोडले जात आहेत. त्याचप्रमाणे भाजपा, संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात लोकांमध्ये आक्रोश आहे. ज्याप्रकारे मोदी, संघ, आणि भाजप संसदीय लोकशाहीवर आक्रमण करून ती संपवू पाहत आहे, तिचे रक्षण करण्याची गरज आहे. त्यासाठी देशाला आणि मोदी, संघ, भाजपा विरोधातील पक्षांना आणि जनतेला जोडण्याचे काम काँग्रेस करत आहे.

सर्वात महत्वाचे म्हणजे हे मोदी सरकार सर्वात श्रीमंत लोकांसाठी काम करत आहे. गरिबांच्या खिशातून पेट्रोल- डिझेलमधून पैसा काढून ते 15- 20 श्रीमंतांच्या खिशात घालण्याचे काम करत आहे. मनमोहनसिंग पंतप्रधान असताना आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या एका ब्यारेलची किंमत ही 140 रुपये होती आज ती 70 रुपयांच्या दरम्यान आहे, त्यामुळे पेट्रोल-डिझेल वरील सर्व पैसा हे मोदी सरकार श्रीमंतांच्या खिशात टाकत आहे, त्यांच्यासाठी काम करत आहे.

मोदी सरकारने नोटबंदी करून मुंबईकरांवर आक्रमण केले, त्यांचे छोटे उद्योग आणि रोजगार अडचणीत आणले. मुंबईतील कपडा, लेदर आदी अनेक उद्योग अडचणीत आले आणि त्यानंतर गब्बरसिंग टॅक्स लावून त्यांना पुन्हा अडचणीत टाकले. यामुळे मुंबईतील आणि देशातील लहान उद्योजक, दुकानदार, सर्वसामान्य जनता दुःखी आहे. मी मुंबईला जेव्हा येतो, त्या-त्या वेळी माझे मुंबईकर माझे चांगले स्वागत करतात. त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो असेही राहुल गांधी यावेळी पत्रकार परिषदेत म्हणालेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

पंतप्रधान मोदींनी लोकांना देशभक्तीची सर्टिफिकेट वाटू नये !

News Desk

सीमावादावर ‘मविआ’च्या खासदारांची शाहांसोबत चर्चा; बोम्मईंने ट्वीट करत पुन्हा महाराष्ट्राला डिवचले

Aprna

शिवसेने नेते अर्जुन खोतकरांवर EDची कारवाई; सहकारी साखर कारखान्याची जमीन केली जप्त

News Desk
राजकारण

गरीबांच्या खिशातला पैसा श्रीमंतांकडे जातो | राहुल गांधी

News Desk

मुंबई | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या महाराष्ट्र दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. मोदी सरकार देशातील गरीबांची लूट करुन श्रीमंतांचे खिसे भरत आहे. अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीं देशातील सर्व संस्था ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका राहुल गांधी यांनी केली. मुंबईत घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

भारताचे संविधान, संस्थांवर आक्रमण करणाऱ्या भाजपा, आरएसएसविरोधात देशातील सर्व विरोधीपक्ष एकवटले आहेत. लोकांच्या भावना विरोधक राजकीय व्यासपीठावर मांडत असल्याचे राहुल गांधी म्हणाले. एकीकडे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे भाव कोसळले तरी देशात पेट्रोलचे दर महाग आहेत.

हा पैसा थेट श्रीमंतांच्या खिशात जात आहे. देशातील श्रीमंतांसाठी सरकार काम करत आहे, त्यांची कर्जे माफ केली जात आहेत. पेट्रोल, डिझेलचे दर जीएसटीतंर्गत आणावेत अशी आमची मागणी आहे. मात्र, पंतप्रधान मोदींकडून दुर्लक्ष करत होत असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले. दरम्यान, राहुल गांधी आज चंद्रपुरात दादाजी खोब्रागडेंच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी जाणार आहेत.

Related posts

ईडीच्या चौकशीनंतरही माझं तोंड थांबणार नाही !

News Desk

राजकीय नेत्यांनी केला वायूदलाला सलाम

News Desk

भाजपच्या विजयानंतर मोदी-शहांनी घेतली लालकृष्ण अडवाणींची भेट

News Desk