HW News Marathi
महाराष्ट्र

१२ जूनपर्यंत मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा

मुंबई | पहाटेपासून मुंबईसह उपनगर, ठाणे, भिंवडी परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे मुंबईची लाईफलाईनवर कोणताही परिणाम झालेला नाही. मध्य, पश्चिम आणि हार्बर रेल्वे सेवा सुरळीतपणे सुरू आहेत. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. १२ जून पर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे.

मुंबई उपनगरामध्ये रात्रभरात सर्वाधिक पाऊस मुलुंड, भांडुप भागात झाल्याची नोंद आहे. याशिवाय कांजूरमार्ग, पवई, अंधेरी, वांद्रे परिसरात रिमझिम पाऊस सुरु आहे. तसेच भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाल्यामुळे सखल भागात पाणी साचले. ५० ते ६० घरात पावसाचे पाणी शिरले. जैतुनपुरा भागात इलेक्ट्रिक पोलचा शॉक लागून एकाचा मृत्यू झाला असून भिंवडीत वीज पुरवठा खंडित झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

अर्णब गोस्वामींना कोठडी होण्यासाठी पोलिसांनी कोर्टात मांडले युक्तीवाद

News Desk

भीमा-कोरेगाव चौकशी आयोगाकडे शरद पवारांना समन्स बजावण्याची मागणी

swarit

माझा बाॅडीगार्ड मारहान केली नाही : एकनाथ शिंदे

News Desk
देश / विदेश

गोव्याचे माजी काँग्रेस प्रमुख शांताराम नाईक यांचे निधन

News Desk

पणजी | माजी राज्यसभा सदस्य आणि माजी गोवा काँग्रेसचे प्रमुख शांताराम नाईक यांचे शनिवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. नाईक यांना सकाळी अस्वस्थ वाटू लागल्याने त्याना मडगाव या त्यांच्या घराजवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.

७३ वर्षीय शांताराम नाईक यांच्या अशा जाण्याने आम्हाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या रुपाने आम्ही एक मार्गदर्शक गमवला आहे. नाईक यांनी अनेक युवकांना काँग्रेसमध्ये येण्यासाठी अमुल्य असे मार्गदर्शक केले होते. नाईक यांच्या जाण्याने गोवा काँग्रेसचे मोठ नुकसान झाले असल्याचे गोवा काँग्रेस नेता गिरीश राया यांनी सांगितले.

  • शांताराम यांचा अल्प परिचय

शांताराम नाईक यांनी गोवा काँग्रेस पार्टीच्या वतीने १९८४ मध्ये पहिल्यांदा लोकसभा सदस्य म्हणून निवडून आले. नाईक यांनी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्याची मागणी उचलून धरली होती. नाईक यांच्या पाठपुराव्याने गोव्याला १९८७ वेगळ्या राज्याचा दर्जा मिळाला. २००५-२०११ आणि २०११-२०१७ या कालावधीत नाईक दोन वेळा राज्यसभा सदस्य देखील झाले आहेत.

Related posts

‘तालिबानमुळे भारताच्या अडचणी वाढण्याची शक्यता’, राजनाथ सिंह यांनी चिंता दर्शवली

News Desk

येडियुरप्पांच्या मुख्यमंत्री पदबाबत आज होणार सुनावणी

News Desk

#NirbhayaCase: चारही दोषींचे चौथ्यांदा डेथ वॉरंड जारी, २० मार्चला फासावर लटकवणार

swarit