HW News Marathi
महाराष्ट्र

फेसबुक आणि ट्वीटरचा वापर लोकशाही हॅक करण्यासाठी! – सोनिया गांधी

नवी दिल्ली | फेसबुक आणि ट्वीटर यासारख्या सोशल मीडियाचा लोकशाही हॅक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे, असा आरोप काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी लोकसभेत मांडले. सध्या संसदेचे अर्थसंल्पीय अधिवेशन सुरू आहे. नुकतेच देशातील पाच राज्याच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. यात काँग्रेसला पाचही राज्यात मोठा अपयशाचा सामना करावा लागला. यानंतर आज (१६ मार्च) संसदेत सोनिया गांधी बोलताना त्यांनी हा मुद्दा मांडला.

सोनिया गांधी म्हणाल्या, “मला आज महत्वाचा मुद्दा मांडण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आहे. फेसबुक आणि ट्वीटर यासारख्या सोशल मीडियाचा लोकशाही हॅक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. फेसबुक आणि ट्वीटर यासारख्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांचा राजकीय नेते आणि पक्ष सोशल मीडियाचा वापर राजकारणात सोयीनुसार वापर करत आहेत. या माध्यमांतून चुकीची महािती पसरविली जाते. आणि देशातील तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम केले जाते. यासर्व गोष्टी कंपनीला माहिती असून याबाबत ते आपल्या फायद्यासाठी वापर करत आहे,” असे ते लोकसभेत म्हणाले.

काँग्रेसचा उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यात पराभव झाल्यानंतर पक्षातील जेष्ठ नेत्यांची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीनंतर ५ राज्यांच्या प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (पीसीसी) अध्यक्षांना राजीनामे देण्याचे आदेश दिले आहेत. सोनिया गांधीच्या आदेशानुसार, पंजाबचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

संजय राऊतांनंतर सुप्रिया सुळेंचे मुलाखत कुणाल कामरा घेणार?

News Desk

अर्णब गोस्वामींना हायकोर्टाकडून दिलासा नाही,जामीन अर्ज फेटाळला!

News Desk

ईडीच्या मालकांना आम्ही ५ वर्ष नाही, २५ वर्ष घरी बसवू, संजय राऊतांचा सोमय्यावर हल्लाबोल

News Desk