HW News Marathi
महाराष्ट्र

ईडीच्या मालकांना आम्ही ५ वर्ष नाही, २५ वर्ष घरी बसवू, संजय राऊतांचा सोमय्यावर हल्लाबोल

मुंबई | अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरुन शिवसेना आणि भाजप यांच्यात वाद सुरु आहेत. अशात संजय राऊत यांनी भाजप नेते किरीट सोमय्या यांना सुनावले आहे. “ईडीचे मालक दिल्लीत बसले आहेत, तेच आहेत, तेही व्यापारी आहेत. मात्र या व्यापारांना, त्यांच्या दलालांना, त्या गुंडांच्या सरदारांना आम्ही ५ वर्ष नाही, २५ वर्ष घरी बसवू,” असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. “भाजप नेते किरीट सोमय्या यांनी जे जमिनीच्या व्यवहाराचे आरोप केले आहेत, ते सर्व खोटे आहेत. त्यांनी ईडीच्या चौकशीची मागणी केली आहे. त्या ईडीचे मालक दिल्लीत बसलेत. ते व्यापारीच आहेत. मात्र या व्यापारांना त्यांच्या दलालांना, त्या गुंडांच्या सरदारांना आम्ही 5 वर्ष नाही, 25 वर्ष घरी बसवू,” अशी टीका संजय राऊत यांनी थेट केंद्रावर केली.

“ईडी, सीबीआय, इंटरपोल, सीआय, केजी, युनोकडे जा किंवा इतर कुठेही जा, ते स्वत: भ्रष्टाचारी आहे. त्यांच्या तोंडाला शेणाचा वास येतो आहे, ते दुसऱ्याच्या तोंडाला वास घेत आहेत,” असेही ते म्हणाले.“या व्यापारांचे जे एजंट आहेत, तेच ईडी वैगरे सांगत आहे. ईडी काय तुमच्या बापाची नोकर आहेत का? तसं असेल तर सांगा. रोज रोज हे काय धंदे सुरु आहेत,” अशी टीकाही राऊतांनी यावेळी केली.“आमची भूमिका अन्वय नाईक यांच्या पत्नीला न्याय द्याची आहे. ज्यांनी त्यांच्या पतीला आत्महत्येस प्रवृत्त केलं, त्यांना शिक्षा देण्याची आहे. मात्र शेठजींच्या पक्षातील काही प्रवक्ते आहेत, त्यांना गुन्हेगारांना वाचवायचं आहे. म्हणून ते अशाप्रकारची फडफड करत आहेत. त्यांनी कितीही फडफड केली तरी त्यातून काहीही निष्पन्न होणार नाही,” असा टोलाही संजय राऊतांनी लगावला आहे. “हा व्यवहार पूर्णपणे कायद्याच्या चौकटीत राहून केलेला आहे. जर एखादा व्यवहार केला असेल तर त्यात भ्रष्टाचार, भ्रष्टाचार असे बोंबलत आहेत. ते रोज सकाळी आरशात स्वत:चा चेहरा पाहतात. त्यांना स्वत:कडे पाहून भ्रष्टाचार झाला असं वाटतं,” असेही संजय राऊत म्हणाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव द्या

News Desk

आजपासून भरता येणार बारावीच्या परीक्षेचे अर्ज

News Desk

धक्कादायक ! बारामतीत एकाच कुटुंबातील ५ जण कोरोना पॉझिटिव्ह

News Desk