HW News Marathi
महाराष्ट्र

बीडमधील शिवसैनिकांची आमदार संदीप क्षीरसागर विरोधात उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदेंकडे थेट लेखी तक्रार

बीड | बीड मतदारसंघात शिवसेना प्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेष बाब म्हणून मंजुरी दिलेले विकासकामे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत. अन्यायकारक वर्तवणुक मी सहन करनार नाही सदर अडवलेली कामे तत्काळ शिवसेनेला द्यावेत, अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी शिवसेना नेत्यांकडे आज (१२ फेब्रुवारी) केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख तथा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या शासकीय स्वीय सहाय्यकांकडे तसेच शिवसेना नेते तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन दिले. निवेदनात पुढे म्हटले की, महाविकास आघाडी स्थापन होऊन २ वर्षे पूर्ण झाली. विकासकामांना गती मिळावी म्हणून विकासकामे निश्चित करण्यात आली. त्या अनुषंगाने आम्ही सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात फेब्रुवारी २०२० च्या अर्थसंकल्पात बीड तालुक्यातील चर्हाटा व पालवण गावाला जोडणाऱ्या पुलांना मंजूरी मिळावी म्हणून संभाजीनगरचे जिल्हाप्रमुख तथा आमदार अंबादास दानवे यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली होती.

दरम्यान, सदर विनंती मान्य करून विशेष बाब म्हणून फेब्रुवारी २०२० च्या अर्थसंकल्पात या कामना समाविष्ट करून मंजूरी दिली. ही कामे राष्ट्रवादीचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी अडवली आहेत. अधिकाऱ्यांवर दबाव तंत्राचा वापर करत आहेत. आम्ही त्यांना वारंवार विनंती करूनही त्यांनी अडवणूक सुरू केल्याने नाईलाजास्तव आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करावा लागला.अन्यायकारक बाबी मी तर सहन करनार नाही .सदरील कामा बाबत संबंधित यंत्रणांना आदेशित करावे अशी मागणी शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिन मुळूक यांनी मुख्यमंत्र्यांसह शिवसेना नेत्यांकडे केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“१५ ऑगस्ट पासून एक रुपयामध्ये १० सॅनिटरी नॅपकीन”, हसन मुश्रीफ यांची माहिती

Aprna

आज विधीमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार, राज्यातील जनतेच्या वाटेला काय येणार?

Aprna

“महाराष्ट्रात जर बाळासाहेबांचे आशीर्वाद नसते तर दुर्बीण घेऊन भाजपला शोधावं लागलं असतं”

News Desk