HW News Marathi
कृषी

प्रहार शेतकरी संघटनेचा करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा   

करमाळा | भाकड जनावरे सांभाळण्यासाठी अनुदान गोशाळेस न देता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावे यांसह शेतकऱ्यांच्या अनेक मागण्यासाठी प्रहार शेतकरी संघटनेने करमाळा तहसील कार्यालयावर वाजतगाजत भाकड जनावरांचा मोर्चा काढला. यावेळी मोर्चामध्ये मोठया प्रमाणावर शेतकरी सामील झालेले पहायला मिळाले.

आजचा शेतकरी अनेक संकटाचा सामना करतोय शेतात पिकलेल्या मालाला भाव नाही तर दुसरीकडे दुधाला कमी दर यामुळे बळीराजा चांगलाच अडचणीत सापडला आहे. दुधाला ३५ रु लिटर दर मिळावा व भाकड जनांवराचे अनुदान शेतकऱ्यांना मिळावे या मागणीसाठी आज करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. मुक्या जनावरांच्या तोंडातला घास काढून तो गो-संवर्धन करणार्‍या लबाड संस्था चालकांच्या घशामध्ये घालण्याचा घाट भाजपा सरकारच्या सरकारने घातला आहे.

गो-हत्या बंदी कायदा करून गो-शाळांना मान्यता देवून या शाळांमध्ये शेतकर्‍यांनी आपली भाकड जनावरे दाखल करून थेट शेतकर्‍यांना अनुदान न देता गो-शाळा चालकांना अनुदान देण्याचे काम केले आहे. भाजपा सरकारने जनावरांच्या नावाखाली गो-शाळा चालकांना आयते कुरण उपलब्ध करून दिले. त्यामध्ये प्रत्येक वर्षाला गो-शाळा संस्था चालकांना राज्यामध्ये रुपये ३४ कोटी अनुदान देण्याचे काम हे सरकार करते. म्हणजे प्रत्यक्षात शेतकरीही उपाशी व त्यांच्याकडील भाकड जनावरेही उपाशी ठेवण्याचे काम हे सरकार करत असल्याचा आरोप प्रहार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख अतुल खूपसे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केला .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

जलयुक्त शिवार अभियान, नरेगा कामांच्या नियोजनाकडे लक्ष द्या – जिल्हाधिकारी डोंगरे

News Desk

मराठवाड्यात बळीराजा पावसाचा प्रतिक्षेत

News Desk

सण बळीराजाच्या सर्जा-राजाचा

Gauri Tilekar
मुंबई

सिंधिया हाऊस इमारतीला आग

swarit

चर्चगेट | बलार्ड पिअर येथील सिंधिया हाऊस बिल्डिंगच्या तिस-या आणि चौथ्या मजल्याला भीषण लागल्याची घटना शुक्रवारी साडेचारच्या सुमारास घडली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत. या इमारतीत इनकमटॅक्सचे ऑफीस असून नीरव मोदी, चंदा कोचर, पीटर मुखर्जी, यांसारख्या प्रकरणांचे सर्व दस्तावेज असल्यामुळे ही आग लागली की लावली हा सवाल सध्या उपस्थित केला जातोय.

सध्या हाती आलेल्या माहीतीनुसार साडेचारच्या सुमारास आग लागली असून आत अडकलेल्या ५ जणांना अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरुप बाहेर काढले आहे. आग आद्याप धुमसत आहे. ही इमारत ४ माळ्यांची असून तिस-या माळ्यापर्यंत इनकम टॅक्स कार्यालय आहे तर ४ थ्या माळ्यावर कॅनटीन असल्याचे बोलले जात आहे. आग ३ -या माळाल्याला लागली आहे.

Related posts

Raksha Bandhan Special | राष्ट्राभिमानी समितीचे अनोखे रक्षाबंधन…

News Desk

उद्या हार्बर मार्गावर मेगाब्लॉक! ‘परे’वर रात्रकालीन जम्बो ब्लॉक

News Desk

मुंबईच्या उच्चभ्रु वस्तीत नपुंसकता वाढली

News Desk