HW News Marathi
कृषी

शेतकरी संपाचा दुसरा दिवस, भाज्यांचे भाव गगनाला भिडणार

मुंबई | राज्यातील शेतकऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे. या संपाचा परिणाम शहरांमध्ये जावण्यास सुरुवात झाली आहे. मार्केटमधील भाजीपाल्यांची आवक घटली असल्याचे चित्र दिसून येत आहे. राष्ट्रीय किसान महासंघाच्या वतीने देशाच्या २२ राज्यातील शेतकऱ्यांनी १० दिवसीय संप पुकारला आहे. या संपाला १ जूनपासून सुरुवात झाली असून १० जूनपर्यंत शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे.

संपाच्या काळात शेतमालाची विक्री बंद करण्यात आली आहे. परिणामी भाज्याचे भाव गगनाला भिडणार आहेत. त्याचा थेट परिणाम सामान्य नागरिकांवर होणार आहे. मुंबईच्या दादर भाजी मार्केटमध्ये आज नेहमीपेक्षा निम्म्याच भाजीपालाच्या गाड्या दाखल झाल्या असल्याची माहिती मिळाली आहे. परिणामी मार्केटमध्ये आज भाज्यांचे दर दुप्पट झाले आहेत.

शेतकरी संपाच्या पहिल्या दिवशी खेड-शिवापूर टोलनाक्यावर हजारो लीटर दूध रस्त्यावर टाकून शेतकऱ्यांनी संपाला व्यक्त केला. तसेच महाराष्ट्र, मध्यप्रदेश, हरियाणा, पंजाब या राज्यातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला .

शेतकऱ्यांचे कर्जमाफी आणि शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. या संदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

रासायनिक खत विक्रीसाठी निर्बंध

News Desk

झेंडुच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना दसरा पावला

News Desk

मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यात ७ हजार सौर कृषिपंप लावण्यास मंजुरी

swarit