HW News Marathi
कृषी

मराठवाड्यात बळीराजा पावसाचा प्रतिक्षेत

औरंगाबाद | संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचे दमदार आगमन झाले आहे. महाराष्ट्रातील बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. परंतु वरुणराजा मात्र मराठवाड्यावर नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. मराठवाड्यातील ४२१ मंडळाने पावसाची दिलेल्या आकडेवारीनुसार त्याची अनियमिता दाखवली आहे. काही भागातील शेतकऱ्यांनी पेरणी केली आहेत. परंतु पावसाच्या आभावामुळे शेतकऱ्यांचे पीक धोक्यात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली आहे.

तसेच जालना जिल्ह्यातील रामनगर, मिरखेडा, भोजपूरी, हडप सावरगाव, भीलपूरी आदी गावशिवारात पावसाने दाडी मारली असल्याची माहिती या भागातील शेतकऱ्यांनी दिली आहे. त्यामुळे या भागातील पेरण्या खोळंबल्या आहेत. तर मराठवाड्यातील ४२१ मंडळापैकी ८ आठ मंडळांत केवळ दोन दिवस पाऊस पडला. अपेक्षित पावसाच्या तुलनेत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना केवळ पावसाची प्रतिक्षा करावी लागणार की निसर्गाच्या कृपेने पावसाचे लवकर आगमन होणार हे पाहाणे येत्या काळात महत्त्वाचे ठरणार आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

झेंडुच्या शेतीमुळे शेतकऱ्यांना दसरा पावला

News Desk

दुर्गम भागात रस्त्यांवरही होत आहे भाजीविक्री

News Desk

1 नोव्हेंबरपासून यंदाचा उस गाळप हंगाम

News Desk