HW News Marathi
कृषी

राज्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन चिघळले

मुंबई | राज्यात दुधाची दरवाढ व शेतकऱ्यांच्या खात्यात थेट प्रतिलीटर पाच रुपये जमा करण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सोमवार पासून आंदोलन सुरू आहे. सोमवारी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी या आंदोलनाचे तीव्र पडसाद उमटल्याचे पाहायला मिळाले होते. सरकारने या आंदोलनाबाबत योग्य निर्णय न घेतल्यामुळे अद्याप हे दूध आंदोलन महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

सोमवारी सुरू झालेल्या या आंदोलनाचे पडसाद राज्यात मंगळवारी देखील पहायला मिळत आहेत. मंगळवारी पुण्यातील हडपसर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी गोकूळ दुधाचा टँकर फोडला. त्यामुळे दूध सुरक्षित रित्या ग्राहकांपर्यंत पोहचावे म्हणून पोलिसांनी मुंबईतल्या दूध गाड्यांना संरक्षण दिले आहे.

सोमवारी संपाचा पहिला दिवस असल्यामुळे त्याचे विशेष पडसाद मुंबई शहरात उमटले नव्हते. परंतु कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, अहमदनगर जिल्ह्यांत सोमवारी शेतकऱ्यांनी दूधच न दूध डेअरीमध्ये न घातल्याने दूध संकलन जवळपास ठप्प झाले. त्यामुळे दूध आंदोलनाचा परिणाम पहिल्या दिवशी मुंबई शहर व उपनगरांत जाणवला नसला तरी आंदोलन दोन-तीन दिवस असेच सुरू राहिल्यास दुधाची टंचाई जाणवू शकते.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रहार शेतकरी संघटनेचा करमाळा तहसील कार्यालयावर मोर्चा   

News Desk

रासायनिक खत विक्रीसाठी निर्बंध

News Desk

वऱ्हाडात यंदा करावी लागणार तिबार पेरणी

News Desk