HW News Marathi
Covid-19

मुंबईतील रूग्ण संख्या २० हजारांचा टप्पा ओलांडला तर…!

मुंबई | “ज्या दिवशी मुंबईतील रूग्ण संख्या २० हजारांचा टप्पा ओलांडेल, त्या दिवशी लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा लागेल,” असे संकेत  मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे. महापौरांनी आज (४ जानेवारी) पत्रकार परिषदेत घेऊन सांगितले आहे.  मुंबईत आता पुन्हा एकदा कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असल्याचे चित्र आहे. दररोज कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेची चिंता वाढते आहे. आधीच मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी लॉकडाऊनचे संकेत दिलेले असताना आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही चिंता व्यक्त करत मुंबईकरांना आवाहन केलं आहे.

मुंबईत वाढत असलेली कोरोना रूग्णांची आकडेवारी पाहता महापौरांनी आज (४ नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेतली. महापौर म्हणाल्या, ‘केंद्र सरकार आणि राज्य सरकार तिसरी लाट रोखण्याच्या तयारीत आहे. मुंबईत कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या पाहता शाळा बंद करण्याचा निर्णय योग्य वेळी घेण्यात आला आहे. तसेच लोकांनी गर्दी टाळावी, असे मुख्यमंत्री वारंवार सांगत आहेत. त्यामुळे लोकांनी विवाह समारंभाला जाणे टाळावे. तसेच दिलेल्या नियमांनुसार लोकांनी विवाह सोहळे आयोजित केले पाहिजेत. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थित असे सोहळे करावे’, असे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन लावण्याचा विचार

पेडणेकर म्हणाल्या, ‘लॉकडाऊन नको असेल तर नियम पाळा, मास्क लावा, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा. ज्या दिवशी मुंबईतील रूग्ण संख्या २० हजारांचा टप्पा ओलांडेल, त्या दिवशी लॉकडाऊन किंवा मिनी लॉकडाऊन लागू करण्याचा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तर लॉकडाऊनचा विचार करावा लागेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. तसेच ज्या इमारतीत २० टक्क्यांहून अधिक रुग्ण आढळतील ती संपूर्ण इमारत सील करण्याचा निर्णयही पालिकेने घेतला आहे, असेही त्यांनी सांगितले.

शिवसेनेचे सर्व कार्यक्रम रद्द

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरी घाबरण्याची गरज नाही. मात्र, वाढणारी रुग्णसंख्या पाहता ही चिंतेची बाब आहे. पालिकेकडूनही लसीकरणावर भर दिला जात असून काल (४ जानेवारी) १५ ते १७ वयोगटातील अडीच हजार मुलांचे लसीकरण झाले, असल्याचेही पेडणेकर यांनी सांगितले. दरम्यान, कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेसुद्धा सर्व गर्दीचे कार्यक्रम रद्द केले आहेत. तसेच इतर पक्षांनीसुद्धा गर्दी करु नये. दिलेल्या नियमात कार्यक्रम आयोजित करावे, असे आवाहन किशोरी पेडणेकर यांनी केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सेलिब्रिटींना, राजकारण्यांना कोरोनावरील औषधे कोण पुरवते!

News Desk

ट्रम्प यांचा भारताला इशारा ,मदत करा नाहीतर ..

Arati More

कोरोना हॉटस्पॉट भागातील सर्वाधिक रुग्ण बरे, तर आतापर्यंत ७६८८ रुग्णांना डिस्चार्ज

News Desk