HW News Marathi
Covid-19

मुंबईतील इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद; BMC निर्णय

मुंबई | कोरोना आणि ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या शाळा ३१ जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय बीएमसीने घेतला आहे. मुंबईत कोरोनाचा वाढात फैलाव लक्षात घेऊन पुन्हा एकदा शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि राज्यभरातील शाळांबाबतही आज (३ जानेवारी) निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, मुंबईतील ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन शिक्षण मात्र सुरू राहणार आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने देशभरात आजपासून (३ जानेवारी) १५ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरुवात झाली.

राज्यात काल (२ जानेवारी) ११ हजार, ८७७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यात मुंबईत ८ हजार ६३ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून कोरोनाचा नवा व्हेरियंट ओमायक्रॉनच्या ५० रुग्णांचा यात समावेश आहे. तसेच २४ तासांत ९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. कोरोना रुग्ण वाढीचा वेग शनिवारी (१जानेवारी) च्या तुलनेत रविवारी (२जानेवारी) २७ टक्क्यांनी वाढला आहे. राज्यात काल ऑमायक्रॉनच्या ५० रुग्णांची नोंद झाली. मिळालेल्या माहितीनुसार, पीएमसी ३६ , पिंपरी चिंचवड ८,पुणे ग्रामीण- २, सांगली- , ठाणे- १, मुंबईमध्ये एका रुग्णाची नोंद करण्यात आली. राज्यात आतापर्यंत एकूण ५१० ऑमायक्रॉनचे रुग्ण राज्यात आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपाची आजची काळी कृती महाराष्ट्र कधीही विसरणार नाही !

News Desk

‘एन-95’ मास्क किंवा कोणतेही मास्क असो ते ठराविक किंमतीत विकावे

swarit

शरद पवारांच्या मुंबईतील ‘सिल्व्हर ओक’ बंगल्यात कोरोनाचा शिरकाव !

swarit