HW News Marathi
क्राइम

अपघातातील सहा दुर्दैवी मयतांचे एकाच चितेवर सामुहिक अंत्यसंस्कार

अंगावरची हळद निघण्यापुर्वीच मयत सुधाकरची पत्नी अर्चना झाली विधवा

उत्तम बाबळे नांदेड :- वसमत – अर्धापुर महामार्गावरील मेंढला शिवारात २८ मे च्या रात्री चुकीच्या ठिकाणी उभे केलेल्या टिप्पर व टाटा सुमोच्या भिषण अपघातात माै.बेंदी (तांडा) ता.भाेकर जि.नांदेड येथील सहा जण जागीच ठार व ११ जण गंभीर जखमी झाले होते. एकाच कुटूंबातील त्या सहा दुर्दैवी मयतांवर २९ मे रोजी माै. बेंद्री (तांडा) येथे शोकाकूल वातावरणात एकाच चितेवर सामुहिक अंत्यसंस्कार करण्यात आले.तर नुकतेच लग्न झालेल्या सुधाकर जाधव यांचा यात मृत्यु झाला व त्याची पत्नी नववधू अर्चना ही अंगावरची हळद निघण्यापुर्वीच विधवा झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. माै.बेंद्री (तांडा)ता.भोकर येथील सुधाकर जाधव (२५ ) या उमदा तरुणास गेल्या दोन वर्षापुर्वी कै.लक्ष्मणराव घिसेवाड महाविद्यालय भोकर येथे प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नाैकरी लागली होती.त्यामुळे यंदा २३ मे २०१७ रोजी वसमत येथील अर्चना हिच्याशी सुधाकर जाधवचे लग्न झाले होते.याच अनुशंगाने मांडव परतनीसाठी जाधव कुटूंबीय वसमत येथे अर्चनाच्या माहेरी गेले होते.हा घरगुती सोहळा आटोपुन जाधव कुटूंबीय टाटा सुमो जिपने २८ मे रोजी गावाकडे परतत असतांना रात्री वसमत फाटा ते अर्धापुर महामार्गावरील मेंढला शिवारात रस्त्यावर चुकीच्या ठिकाणी उभे केलेल्या नादुरुसुत रेती वाहक टिप्परला ती टाटा सुमो जिप धडकली.या भिषण अपघातात जाधव कुटूंबातील ६ जण जागीच ठार झाले.तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत.मयतात नवरदेव सुधाकर जाधव यांचा तर गंभीर जखमीत नववधू अर्चना सुधाकर जाधव हिचा समावेश आहे. जाधव कुटूंबातील त्या सर्व दुर्दैवी मयतांवर २९ मे रोजी माै.बेंद्री (तांडा) येथे शोकाकूल वातावरणात एकाच चितेवर सामुहिकरित्या अंत्यसंस्कार करण्यात आले.यावेळी काँग्रेस पक्षाचे नांदेड जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील नागेलीकर,जि.प.सदस्य बाळासाहेब पाटील रावणगावकर,माजी सभापती नागनाथराव घिसेवाड,डाॅ.यु.एल.जाधव,डाॅ.राम नाईक,बाजार समिती संचालक बाबूराव सायाळकर,नगरसेवक मनोज गिमेकर,यांसह विविध पक्षांचे नेते,पदाधिकारी,नातेवाईक,प्राद्यापक,शिक्षक व परिसरातील बहुसंख्य नागरीक उपस्थीत होते.स्व. सुधाकर जाधव यांच्या कुटूंबात आता फक्त आई,एक लहान भाऊ व विधवा पत्नी हेच आहेत.कुटूंबातील कर्ते पिता व पुत्र यांचा मृत्यू झाला व अंगावरची हळद देखील निघाली नाही अशा नववधू अर्चनाला विधवा व्हावं लागलं.हा नियतीचा मोठा घाव या कुटूंबावर झाल्याने बेंद्री (तांडा)या गावासह तालुक्यात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

बॅगेत मृतदेह टाकून मुलगी, जावाई फरार

News Desk

कौमार्य चाचणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर, पुण्यात तिघांवर हल्ला

swarit

राम रहिमच्या सेवेसाठी अडीचशे साध्वी

News Desk