HW News Marathi
क्राइम

बाप-लेकीचा शोध घेताना दुसऱ्या खूनाच उलगडा

खडकवासला (पुणे) : मुठा नदीच्या पात्रात मंगळवारी बाप लेकीचा शोध घेताना आणखी एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. त्याचे नाव संदीप खंडू भिसे (वय40,कोंढवे- धावडे) असून त्याचा गळा आवळून खून केला आहे. खुन करणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे.

याबाबत उत्तमनगरचे पोलीस निरीक्षक कल्याण विधाते यांनी सांगितले की, भिसे याचा खून केल्या प्रकरणी सतीश वामन देडगे (वय 50, नांदेड) यास बुधवारी अटक केली. मयत भिसे यांचा मुलगा अमर याने तक्रार दिल्याने खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.

देडगे व मयत भिसे यांच्या पत्नीचे अनैतिक सबंध होते. म्हणून देडगे यांनी भिसे याचा गळा आवळून खुन केला. त्यानंतर त्याचा मृतदेह धरणालगतच्या नदी वरील पुलावरून वाहत्या पाण्यात टाकला होता. मयत भिसे हे धायरी ग्रामपंचायतमध्ये पाणी सोडण्याचे काम करतात. सोमवारी संध्याकाळी त्यांनी पत्नीला जेवण तयार ठेव असे फोन करून सांगितले. त्यांनतर ते रात्री घरी परतले नाही. म्हणून त्याच्या नातेवाईकांनी शोध घेतला. परंतु सापडले नाहीत. सकाळी अग्निशामक दलास हा मृतदेह सापडला पोलीस तो अज्ञात असल्याने त्याचा तपास सुरू केला होता. दरम्यान संध्याकाळी त्याचे नातेवाईकांना माहीती मिळाली आणि ते पोलिस चौकीत आले. त्याने त्याला ओळखले. त्यांनतर त्याची मोटार सायकल खडकवासला धरणालगत कालव्याच्या परिसरात आढळली. शवविच्छेदन नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गोळीबार करुन पकडला, फरार आरोपी

News Desk

सिमी खटल्याचा निकाल : जळगावच्या दोघांना सक्तमजुरी

News Desk

कोल्हापूरात महिलेची ठेचून हत्या

News Desk
देश / विदेश

बिहारमध्ये राजकीय भूकंप

News Desk

नवी दिल्ली: बिहारमध्ये राजकीय भूकंप झाला आहे. राज्यातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. जेडीयूच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी राजीनामा दिला आहे. राज्यपाल के. एन. त्रिपाठी यांची भेट घेऊन त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. इतकेच नाही तर मोदींनी त्यांना भाजपमध्ये येण्याची आॅफरही दिली आहे. भ्रष्टाचाराशी आपण एकत्र लढू असेही मोदींनी म्हटले आहे.

तेजस्वी यादव उपमुख्यमंत्रीपद न सोडण्यावर ठाम आहेत. आरोप असलेल्या मंत्र्यांसोबत काम करणे अशक्य असल्याचे नितिशकुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर सांगितले आहे. बिहारच्या हितासाठी आपण काहीही करायला तयार आहे.

बिहारमधील जेडीयू-आरजेडी-काँग्रेस महायुती अवघ्या २० महिन्यांत तुटली आहे. लालू प्रसाद यादव यांनी ही चर्चा वायफळ असल्याचे म्हटले होते. महाआघाडी तुटण्याचा प्रश्नच नसल्याचे ते म्हणाले होते.

‘नितीशकुमारांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर तेजस्वी यादव यांचा राजीनामा मागितलेला नाही. या प्रकरणात मीडियालाच अधिक स्वारस्य आहे. नितीशकुमार आमचे नेते आहेत. ‘महाआघाडीत फूट’ या मीडियातून पसरवल्या जाणाºया अफवा आहेत.’, असे लालूंनी काही वेळेपूर्वी म्हटले होते.

राष्ट्रीय जनता दलाच्या आमदारांची बुधवारी बैठक झाली. त्यानंतर लालू यादव म्हणाले, ‘बिहार सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार आहे. महाआघाडीत काहीही चलबिचल नाही. सगळ्या मीडियाच्या अफवा आहेत. नितीशकुमारांनी तेजस्वींचा राजीनामा मागितलेला नाही.’ तेजस्वी यादवही म्हणाले की मला कधीही राजीनामा मागितला गेला नाही. नितीशकुमारांनीही आज आमदारांची बैठक बोलावली आहे. लालू यादव व त्यांच्या कुटुंबावर रेल्वे निविदा घोटाळा आणि बेहिशेबी मालमत्ते प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर तेजस्वी यादवांच्या राजीनाम्याची भाजपने मागणी केली होती. जेडीयूचे म्हणणे होते की तेजस्वी यांनी जनतेसमोर स्पष्टीकरण द्यावे.

Related posts

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांवर दारू पिऊन गोंधळ घालणाऱ्यांनो खबरदार …

Arati More

देशासाठी काम करणा-या राॅ एजंटला सरकारने सोडले वा-यावर

News Desk

माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज अनंतात विलीन, विद्युत दाहिनीत अंत्यसंस्कार

News Desk