HW News Marathi
क्राइम

मुलीची गळा चिरून हत्या

लखनऊ, मुलीला अनेकदा समजावूनही मुलगी प्रेमसंबंध तोडत नसल्याने रागाच्या भरता पित्याने स्लताच्या मुलीची गळा चिरून हत्या केली त्यानंतर प्रिकराच्या दरवाजात मृतदेह फेकला. उत्तरप्रदेशातील मुझफ्फरनगर जिल्ह्यातील चारथावाल गावात बुधवारी भरदिवसा ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी पिता जब्बार कुरेशीला अटक केली आहे.

गुलसबाचे दिलनवाज अहमद या मुलाबरोबर प्रेमसंबंध होते. या नात्याला जब्बार यांचा विरोध होता. बुधवारी सकाळी गुलसबाच्या आईला शेजारच्या खोलीतून तिचा आवाज ऐकू आला. गुलसबा बरोबर घरात कोणीतरी पुरुष असल्याचे तिला समजले. तिने दरवाजाला कडी लावली आणि नवरा जब्बारला याची माहिती दिली.

 

तोपर्यंत दिलनवाजला घरात कोंडून ठेवल्याचे शेजा-यांना समजले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याची माहिती. पोलिसांनी तिथे येऊन दिलनवाजची सुटका केली. जब्बारचा रस्त्यावर कपडे विकण्याचा व्यवसाय आहे. सकाळी आठच्या सुमारास जब्बार रागाच्या भरात घरी आला. त्याने कुठलाही विचार न करता गुलसबाची गळा चिरुन हत्या केली आणि तिचा मृतदेह दिलनवाजच्या दरवाजात नेऊन फेकला. त्यानंतर जब्बारने स्वत:च पोलिस स्टेशनमध्ये जाऊन गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी लगेच जब्बारला अटक केली.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोघांना अटक

News Desk

दाऊदच्या खंडणी टोळीत राजकारण्यांची नावं

News Desk

जेल प्रशासनाकडून कायदेशीर कारण सांगत आर्यनच्या सुटकेस नकार

News Desk
महाराष्ट्र

१० रुपयाचे नाणे घेण्यास ग्रामीण भागातील बँकांचा नकार ,मॅनेजरने शेतक-याला बँकेतून बाहेर काढले.

News Desk

स्पेशल स्टोरी

उत्तम बाबळे

एस.बी.एच शाखा व्यवस्थापकाविरुद्ध कारवाई करण्याची शेतक-याची मागणी नांदेड:- भोकर तालुक्यातील माै.नागापुर येथील एक शेतकरी एस.बी.एच.शाखा भोकर येथे १० रुपयाचे १०० नाणे जमा करण्यासाठी गेला असता बँक शाखा व्यवस्थापकाने ते नाणे घेण्यास नकार देत शेतक-याला अपमानीत करुन बँकेबाहेर काढले असून त्या शेतक-याने हे नाणे जमा करुन सदरील व्यवस्थापकाविरुद्ध कार्यवाही व्हावी अशी मागणी केली आहे. खरीप हंगाम २०१७ सुरु झाला असून ग्रामीण भागातील शेतक-यांनी आपल्याकडील बचतीतून जी जमापुंजी जमवलेली आहे ती बाजार पेठेत आनून बी बियाणे ,खते खरेदी करत आहेत.याच अनुशंगाने माै.नागापुर येथील मारोती पोषट्टी बेरदेवाड हा शेतकरी त्यांच्या पत्नीने घरगुती वापरातून बचत केलेले १० रुपयाचे १००नाणे असे एकून १००० रुपये घेऊन २२ मे २०१७ रोजी बियाणे खरेदीसाठी भोकर येथे आला असता बाजार पेठेत त्यांचे ते नाणे कोणीही स्विकारले नाहीत.म्हणून त्याने त्या दिवशी ते नाणे भोकर येथील एस.बी.एच.शाखेतील त्याच्या खात्यात जमा करण्याचे ठरविले व रितसर बँकस्लीप भरुन रोकड जमा करण्याच्या खिडकीला गेले असता रोखपालाने ते नाणे जमा करुन घेण्यास नकार दिला.याबाबद बँक व्यस्थापकांना त्या शेतक-याने हे नाणे न स्विकारण्याचे कारण विचारले असता त्यांना योग्य उत्तर देण्याऐवजी अपमानीत करुन बँकेबाहेर हाकलून दिले.

वास्तविक पाहता आर.बी.आय.ने १० रुपयाचे नाणे चलनातून बाद केलेले नाही.तरी देखील काही व्यापारी व बँका ते स्विकारत नाहीत.” मै धारक को रुपये अदा करने का वचन देता हूँ! ” असे वचन आर.बी.आय.ने दिलेले असतांनाही ग्रामीण भागातील बँका हे ब्रीद विसरुन सामान्य नागरीक व शेतक-यांना नाहक त्रास देत आहेत.असाच त्रास मारोती बेरदेवाड यांना झाला असल्यामुळे त्यांनी बँक वरीष्ठ अधिकारी व शासनाकडे न्याय मागीतला असून त्यांना अपमानीत करणा-या त्या शाखा व्यवस्थापका विरुद्ध कार्यवाही करण्यात यावी म्हणून एका निवेदनाद्वारे भोकर उपविभागीय अधिकारी दीपाली मोतीयेळे यांच्याकडे मागणी केली आहे.वरीष्ठ अधिकारी याबाबद काय कार्यवाही करतील ? याकडे त्या गरीब शेतक-यांसह त्रास सहन करावा लागत असलेल्या अनेकांचे लक्ष लागले आहे.

Related posts

पंढरपूरच्या पायी वारीचा निकाल आज सर्वोच्च न्यायालयात!

News Desk

#CoronaVirus : केंद्राने राज्यातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांना तातडीने चाचणीची परवानगी द्यावी, आरोग्यमंत्री

swarit

मुख्यमंत्र्याच्या भूमिकेविरोधात काँग्रेस नेत्याचं थेट राज्यपालांना पत्र

News Desk