HW News Marathi
क्राइम

दिवा येथे एका रिक्षातून स्फोटक पदार्थांचा मोठा साठा जप्त

ठाणे | दिवा आगासन रस्त्यावर एका रिक्षातून २५० जिलेटीन आणि २५० डिटोनेटर्स असा स्फोटकाचा साठा जप्त करण्याची कारवाई मुंब्रा पोलिसांनी केली आहे. या प्रकरणी गुलाबसिंग रावतसिंग सोलंकी या आरोपीस अटक करण्यात आले आहे. सदर आरोपीस गुरुवारी(२९ नोव्हेंबर) न्यायालयात हजर केले असता त्यास न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटके आली कोठून असा प्रश्न पोलिसांसमोर निर्माण झाला आहे.

पोलिसांना माहिती मिळाताच या रिक्षाची तपासणी केली असता त्यात बेकायदेशीर २५० जिलेटीन आणि २५० डिटोनेर हे स्फोटक पदार्थ आढळून आले. हे स्फोटक पदार्थ घेऊन जाणार्‍या गुलाबसिंग रावतसिंग सोलंकी या इसमास पोलिसांनी अटक केली. अटकेतल्या इसमाने हे स्फोटक पदार्थ राजस्थान येथून आणले असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.

मुंब्रा पोलिसांचे सहाय्यक पोलीस निरीक्षक क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक सचिन चरडे, पोलीस नाईक कैलास पाघीर, मोरे, पोलीस कॉन्स्टेबल जाधव, खरात आणि क्षीरसागर यांच्या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावून एका संशयास्पद रिक्षास ताब्यात घेतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

दाऊदच्या खंडणी टोळीत राजकारण्यांची नावं

News Desk

पेट्रोलपंप घोटाळ्यातील मोऱ्हक्या अखेर गजाआड

News Desk

पालकमंत्री राम शिंदेंच्या सुरक्षारक्षकाने केला तरूणीवर लैंगीक अत्याचार

News Desk
राजकारण

राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्जमाफ

News Desk

रायपूर | राजस्थान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगाल आली आहे. निवडणुकीच्या पाश्वभुमीवर काँग्रेसकडून गुरुवारी(२९ नोव्हेंबर) जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात जवळपास ४०० घोषणांचा समावेश करण्यात आला आहे. यात राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत शेतकर्‍यांची कर्जमाफी, वृद्ध शेतकर्‍यांना पेन्शन, महिलांना आजन्म मोफत शिक्षण अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध झाला.

यावेळी सचिन पायलट म्हणाले, “हा केवळ जाहीरनामा नाही, तर आमचे वचनपत्र आहे.” आमचे सरकार पाच वर्षांमध्ये जाहीरनाम्यातील सर्व आश्‍वासनांची पूर्तता करणार आहे. रोजगाराची समस्या लक्षात घेता अभ्यासक्रमात नवे बदल केले जाणार आहेत. यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये पदवीसोबत नोकरी मिळवून देतील अशा अभ्यासक्रमांचा समावेश केला जाईल. कमी व्याजदरात शेतकर्‍यांना कर्ज दिले जाईल. सरकारी कागदपत्रे केवळ ३० दिवसांमध्ये उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

दोन दिवसांपूर्वीच भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये गतवेळच्या जाहीरनाम्यातील घोषणांची ९५ टक्के पूर्तता करण्यात आल्याचा दावा केला आहे. शिवाय, बेरोजगार तरुणांना महिन्याला ५ हजार रुपये भत्ता देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच आम्ही हा भत्ता देण्याची सांगितले होते. भाजपने आमचीच घोषणा चोरून तिचा जाहीरनाम्यात समावेश केला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

Related posts

परभणीत अत्यंत क्षुल्लक कारणावरून शिवसेनेच्या नगरसेवकाची हत्या

News Desk

लोकसभा निवडणुकीत मनसे काँग्रेस-राष्ट्रवादीचा प्रचार करणार

News Desk

मोदी ज्यांना वाचविण्याचा प्रयत्न करतात त्यांच्या खिशातून आम्ही न्याय योजनेसाठी पैसे आणणार !

News Desk