HW News Marathi
राजकारण

राजस्थानमध्ये काँग्रेस सत्तेत आल्यानंतर १० दिवसात शेतकऱ्यांचे कर्जमाफ

रायपूर | राजस्थान विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगाल आली आहे. निवडणुकीच्या पाश्वभुमीवर काँग्रेसकडून गुरुवारी(२९ नोव्हेंबर) जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्यात जवळपास ४०० घोषणांचा समावेश करण्यात आला आहे. यात राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आल्यानंतर अवघ्या दहा दिवसांत शेतकर्‍यांची कर्जमाफी, वृद्ध शेतकर्‍यांना पेन्शन, महिलांना आजन्म मोफत शिक्षण अशा घोषणा करण्यात आल्या आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत, प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध झाला.

यावेळी सचिन पायलट म्हणाले, “हा केवळ जाहीरनामा नाही, तर आमचे वचनपत्र आहे.” आमचे सरकार पाच वर्षांमध्ये जाहीरनाम्यातील सर्व आश्‍वासनांची पूर्तता करणार आहे. रोजगाराची समस्या लक्षात घेता अभ्यासक्रमात नवे बदल केले जाणार आहेत. यासाठी महाविद्यालय आणि विद्यापीठांमध्ये पदवीसोबत नोकरी मिळवून देतील अशा अभ्यासक्रमांचा समावेश केला जाईल. कमी व्याजदरात शेतकर्‍यांना कर्ज दिले जाईल. सरकारी कागदपत्रे केवळ ३० दिवसांमध्ये उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले आहे.

दोन दिवसांपूर्वीच भाजपने आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये गतवेळच्या जाहीरनाम्यातील घोषणांची ९५ टक्के पूर्तता करण्यात आल्याचा दावा केला आहे. शिवाय, बेरोजगार तरुणांना महिन्याला ५ हजार रुपये भत्ता देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, काही दिवसांपूर्वीच आम्ही हा भत्ता देण्याची सांगितले होते. भाजपने आमचीच घोषणा चोरून तिचा जाहीरनाम्यात समावेश केला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

महाराष्ट्राच्या सत्तांतरावर 21 ते 23 तारखेपर्यंत घटनापीठासमोर सुनावणीची शक्यता

Aprna

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीच्या भावाचा शिवसेनेत गटात प्रवेश

Aprna

भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणी खडसेंना दिलासा

News Desk
कृषी

Farmers protest : शेतकऱ्यांचा दिल्लीत हल्लाबोल, आज संसद भवनाला घेराव

News Desk

नवी दिल्ली | कर्जमाफी आणि शेतमालाच्या खर्चावर दीडपट हमीभाव या दोन प्रमुख मागण्यांना घेऊन देशभरातील हजारो शेतकरी संघटनांनी गुरुवारी(२९ नोव्हेंबर) पुन्हा दिल्लीत दाखल झाले आहेत. दिल्लीत दाखल झालेले शेतकरी शुक्रवारी(३० नोव्हेंबर) संसदेवर मोर्चा काढणार आहेत.

अखिल भारतीय किसान संघर्ष समितीच्या माध्यमातून सर्व शेतकरी संघटना एकत्र आले आहेत. या मोर्चाच्या पार्श्‍वभूमीवर राजधानी दिल्लीत कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गुरुवारी दिल्लीत आलेला हा मोर्चा रामलीला मैदानात स्थिरावला आहे. शुक्रवारी येथून संसदेकडे मोर्चा रवाना होणार आहे. यापूर्वीही दिल्लीत शेतकर्‍यांनी रामलीला मैदानावर आंदोलन करून सरकारचे लक्ष आपल्या मागण्यांकडे वेधले होते. मात्र, सरकारशी चर्चा करून आंदोलन स्थगित करूनही मागण्या मान्य न झाल्याने पुन्हा शेकऱ्यांनी या मोर्चाचे आयोजन केले आहे.

शेतकर्‍यांचा कर्जबाजारीपणा आणि आत्महत्या हा विषय शासन दरबारी मांडला जाणार आहे. शेतकर्‍यांच्या उत्पादनात वाढ झाल्यास त्यांना आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. शेतमालाच्या उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव द्यावा, अशी मागणी केली आहे. दिल्‍ली येथे सुरू असलेल्या अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या वतीने सुरू असलेल्या आंदोलनास भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा दिला आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना, किसान सभा, राष्ट्रीय किसान मजदूर संघटना, किसान एकता संघटना, भारतीय किसान युनियन अशा २०८ संघटनांचे सदस्य शेतकरी दिल्लीत दाखल होत आहेत. दिल्लीसाठी महाराष्ट्रातून ‘स्वाभिमानी एक्स्प्रेस’ नावाने ३ रेल्वे आरक्षित केल्या आहेत. किमान २ लाख शेतकरी मोर्चामध्ये सामील होणार आहेत.

Related posts

शेतकरी संपाचा दुसरा दिवस, भाज्यांचे भाव गगनाला भिडणार

News Desk

शेतक-याने दिल्या जानकरांना शिव्या

News Desk

‘दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?’ – महसूलमंत्री चंद्रकांत पाटील

News Desk