HW News Marathi
क्राइम

बँक आॅफ महाराष्ट्राची रोकड लुटली

पंढरपूर: बँक आॅफ महाराष्ट्रची ७० लाखांची रोकड घेऊन निघालेली आय ट्वेंटी गाडी अडवून दरोडेखोरांनी लुटल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी परिसरात नाकेबंदी केली असून संपूर्ण जिल्ह्यात दरोडेखोरांचा शोध सुरू केला आहे.

घडलेल्या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गाडीचा पाठलाग करत चार दरोडेखोरांनी आपली बोलेरो गाडी आडवी लावत ही गाडी अडवली. त्यानंतर बँकेच्या आय ट्वेंटी गाडीतील कर्मचा?्यांच्या डोळ्यात या दरोडेखोरांनी तिखट फेकत गाडीची काच फोडली आणि रक्कम घेऊन पोबारा केला. विशेष म्हणजे ही रक्कम नेत असताना बँकेच्या गाडीसोबत सुरक्षारक्षक नव्हते. बँकेची एवढी मोठी रक्कम खासगी वाहनातून सुरक्षारक्षकांशिवाय कशी नेली जात होती याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पोलीस याचाही तपास करत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

व्हीआयपी नवी आय पी मोबाईल नंबर च्या नावाखाली लोकांची फसवणूक करणा-या रँकेटचा पर्दाफाश

News Desk

मुंब्रातून आणखी १ संशयित एटीएसच्या ताब्यात

News Desk

पोलिस कोठडीतील आरोपीचा मृत्यु

News Desk
मुंबई

भाजपच्या ‘आश्वासनाचा फुगा’ जनताच फोडेल

News Desk

भाजपच्या आश्वासनाचा फुगा जनताच फोडेल

मुंबई छत्रपतीं का आशीर्वाद चलो चले मोदी के साथ असे निवडणुक काळात ब्रीदवाक्य घेत सत्तेवर आलेल्या भाजप सरकारने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांच्या स्मारकाची एकही वीट रचली नाही याचाच अर्थ हे सरकार भूलथापा देवून आपली पोळी भाजून घेण्यात यशस्वी झाले आहे. परंतु हा भूलथापांचा फुगा येत्या काळात जनताच फोडेल असा माझा ठाम विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

अरबी समुद्रामध्ये जाऊन पंतप्रधान मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे जलपूजन केले आणि इंदू मीलमध्ये जावून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचे भूमिपूजनही केले. महाराष्ट्रात सत्ता येण्यासाठी या दोन महापुरुषांच्या स्मारकांचा मुद्दा भाजपाने घेतला आणि सत्तेतही आले. परंतु या सरकारने सत्तेत येताना महापुरुषांच्या स्मारकांना जेवढया पध्दतीने महत्व दिले तेवढे महत्व सत्तेत आल्यावर दिलेले नाही. एकीकडे महाराजांच्या नावाने सत्तेत यायचे आणि दुसरीकडे त्यांच्या स्मारकाची वीटही रचायची नाही हा महाराष्ट्रातील जनतेचा अपमान सरकारने केला आहे. निवडणूक काळामध्ये दिलेली आश्वासने या फक्त भूलथापाच होत्या हे आता जनतेच्या लक्षात आले आहे असा आरोपही मलिक यांनी केलाय.

Related posts

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वे, वाहतुकीसाठी बंद

News Desk

डोंबिवलीतलं अतिक्रमण पाडायला प्रशासनाला वेळ नाही

News Desk

“जिथे विषय गंभीर, तिथे राज साहेब खंबीर”…! राज ठाकरे १३ तारखेला रत्नागिरीच्या दौऱ्यावर

Adil