HW News Marathi
क्राइम

चेष्टा जीवावर बेतली, रागात कु-हाडीने एकाची हत्या

नाशिक- चेष्टा करणे जीवावर बेतल्याची घटना नाशिकमध्ये उघडकीस आली. शहरातील पंचशीलनगरमध्ये गुरुवारी रात्री पावणे अकराच्या सुमारास चेष्टा केल्याचा रागातून दोन तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद इतका टोकाला गेला की,त्यामध्ये आरोपी कैलास शेजुळ याने विशाल प्रकाश झाल्टे याच्यावर कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात प्रकाशचा मृत्यू झाला. हत्येप्रकरणी कैलासला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्याने या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.विशाल प्रकाश झाल्टे (वय २३, रा. पंचशीलनगर) याच्यावर कैलास शेजुळ (वय ३५, रा. पंचशीलनगर) याने कुऱ्हाडीने वार करून त्याची हत्या केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गोखले पूल दुर्घटनेच्या १६ तासानंतर पश्चिम रेल्वेची वाहतूक सुरळीत

News Desk

जॅक निसटून ट्रक अंगावरुन गेल्याने चालकाचा जागीच मृत्यू

News Desk

ट्रॅव्हल्समधील अश्लील व्हिडिओ प्रकरणी, भाजपच्या पदाधिकाऱ्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी

News Desk
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

१४ एप्रिलनंतर लॉकडाऊन पुर्णपणे उघडणार नसल्याचे पंतप्रधानांनी दिले संकेत

News Desk

#Lockdown 2: भारतात ३ मेपर्यंत लॉकडाऊन , पंतप्रधानांची मोठी घोषणा

News Desk

कोरोना व्हायरसच्या विळख्यातून ९० भारतीय मायदेशी परतले

swarit