HW News Marathi
क्राइम

आदर्श आचारसंहितेमुळे जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द

विनोद तायडे

वाशिम : नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते. मात्र दि. १ सप्टेंबर २०१७ पासून जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने सोमवार, दि. ४ सप्टेंबर २०१७ रोजी होणारा जिल्हास्तरीय लोकशाही दिन रद्द करण्यात आल्या

चे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दि. १ सप्टेंबर रोजी ग्रामपंचायत निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होत आहे, अशा ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यात एकूण ४९१ ग्रामपंचायती असून यापैकी २८७ ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे दि. ४ सप्टेंबर २०१७ रोजी होणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

चंद्रकांत पाटलांवर शाईफेक प्रकरणी मनोज गरबडे यांच्यासह तीन जणांना जामीन मंजूर

Aprna

ट्रॅव्हल्समधील अश्लील व्हिडिओ प्रकरणी, भाजपच्या पदाधिकाऱ्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी

News Desk

उल्हासनगरच्या धुरू बारवर छापा

News Desk