HW News Marathi
क्राइम

येवला-मनमाड मार्गावर भीषण अपघात, सहा जणांचा मृत्यू

येवला | येवला-मनमाड मार्गावर इर्टिगा आणि आयशर या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात एका कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात येवला-मनमाड मार्गावरील अनकाई बारीजवळ पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास झाला. हा अपघात इतका भीषण होता की, यात इर्टिंगा कारचा अक्षरश: चुराडा झाला.

या कारमधील जेसीबीच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आली. मृत्युमुखी पडलेले सर्व जण नगर आणि कोपरगाव येथील रहिवासी होते. मृतांमध्ये ३ महिला, २ पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. आयशर गाडी मनमाडच्या दिशेने जात होती, तर इर्टिगा कार ही येवल्याच्या दिशेने जात प्रवास करत होती. यादरम्यान, दोन्ही गाड्या येवला-मनमाड मार्गावर समोरासमोर धडकल्या आणि भीषण अपघात झाला. अपघाताची माहिती कळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सर्वोच्च न्यायालयानं योगी सरकारला फटकारलं- “खास आरोपीला फायदा व्हावा म्हणून..”

News Desk

“बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांमुळे कायदा सुव्यवस्था बिघडू नये याची दक्षता घ्या.” – पालकमंत्री मंगलप्रभात लोढा

Chetan Kirdat

गर्भवती महिलेला कारखाली चिरडले

News Desk