HW News Marathi
क्राइम

आत्महत्येबाबत फेसबूकवर पोस्ट टाकणाऱ्या तरूणाचे वाचवले प्राण

औरंगाबाद- जालना जिल्ह्यातील मंठा येथील एका तरुणाने आत्महत्या करत असल्याचा संदेश फेसबुकवर पोस्ट केला. ही पोस्ट वाचून औरंगाबादमधील अॅडव्होकेट स्वाती नखाते यांनी याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी तरुणाला ताब्यात घेतले. सचिन काळे पाटील, असे या तरुणाचे नाव आहे. नखाते यांनी वेळीच पोलिसांना याबद्दलची माहिती दिल्याने सचिन काळे पाटीलचे प्राण वाचले.

मराठा क्रांती मोर्चामुळे सचिन आणि स्वाती यांची भेट झाली होती. यानंतर त्यांची फेसबुकवर मैत्री झाली. सचिनने काल आत्महत्या करणार असल्याची पोस्ट केली होती. रात्री आठ वाजता आत्महत्या करणार असल्याचे त्यांनी म्हटले होते. नखाते यांनी त्यांची पोस्ट पाहताच पोलिसांनी त्याबद्दलची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी सचिनला ताब्यात घेतले. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत असल्याचे पोलिसांनी सांगितले. नखाते यांनी फेसबुकवरील पोस्टच्या स्क्रीनशॉटच्या मदतीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर सचिनच्या फेसबुक वॉलवरुन पोस्ट हटवण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गरीब मुलांना परदेशात नेणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

News Desk

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अल्पवयीनेवर बलात्कार

News Desk

विनायक मेटेंच्या अपघाती मृत्यू प्रकरणी वाहन चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

Aprna
देश / विदेश

मार्शल अर्जन सिंह यांना भावपूर्ण निरोप

News Desk

नवी दिल्ली- एखेर मार्शल आणि ‘फाइव्ह स्टार रँक’प्राप्त अधिकारी अर्जन सिंह यांना सोमवारी दिल्लीतील बरार स्क्वेअरमध्ये शोकाकुल वातावरणात लष्करी इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अर्जन सिंह यांच्या सन्मानार्थ सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवण्यात आले आहेत.

अर्जन सिंह यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी उपस्थित होते. यावेळी अर्जन सिंह यांच्या सन्मानार्थ बंदुकांची सलामी देण्यात आली. याशिवाय फ्लाय पास्टदेखील करण्यात आला. यावेळी तिन्ही दलांचे प्रमुख उपस्थित होते. १९६५ च्या युद्धावेळी अतुलनीय कामगिरी करणाऱ्या अर्जन सिंह यांना निरोप देताना सर्वांचेच डोळे पाणावले. फील्ड मार्शलचा दर्जा मिळालेले अर्जन सिंह हे हवाई दलाचे एकमेव अधिकारी होते.

Related posts

अरुण जेटली यांची प्रकृती चिंताजनक

News Desk

अनिल देशमुख अभिषेक मनु सिंघवी यांच्या मदतीने सुप्रीम कोर्टाचे दार ठोठावणार

News Desk

दिवाळीच्या तोंडावर घरगुती गॅस महागला

Gauri Tilekar