HW News Marathi
क्राइम

वरळीच्या शासकीय वसतीगृहात विद्यार्थीनीची आत्महत्या

मुंबई : वरळीमध्ये सामाजिक न्याय विभागाची तीन शासकीय वसतीगृहे आहेत. यापैकी दोन वसतीगृह मुलांसाठी असून एक वसतीगृह मुलींसाठी आहे. वरळी बीडीडी चाळ ११६ मध्ये १,२,३ माळ्यावर संत मीराबाई मुलींचे शासकीय वसतीगृह आहे. वसतीगृहात १०० हुन अधिक विद्यार्थीनी सध्या वास्तव्यास आहेत. गुरुवारी दुपारी वरळीच्या संत मीराबाई शासकीय वसतीगृहात २० वर्षीय शितल शिर्के नावाच्या विद्यार्थीनीने गळ फास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

या प्रकरणी वरळी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. शितल ही मुळची शहापूरची रहाणारी असून मुंबईत सेंट झेवियर्स महाविद्यालयामधून डिप्लोमा करत होती. अशी प्राथमिक माहिती समोर आली असून वरळी पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. या घटनेनंतर वसतीगृहातील मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

श्रद्धा वालकरच्या पत्राची महाराष्ट्र पोलिसांनी दखल का घेतली नाही? आशिष शेलारांचा सवाल

Aprna

‘राज्य शासनाला शेतकऱ्यांच्या समस्यांपेक्षा शाहरुखच्या मुलाची चिंता!’- चंद्रकांत पाटील

News Desk

पैसे देण्यास नकार दिल्याने तिचे स्तनच कापले

News Desk
राजकारण

भगवान हनुमान हे दलित नाही, ते तर आदिवासी होते !

News Desk

लखनौ | उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भगवान हनुमान हे दलित असल्याचे वादग्रस्त विधान केल्यानंतर या प्रकरणाची राजकारणात जोरदार चर्चा रंगलेली होती. हे प्रकरण शांत होत असतानाच आता अनुसूचित जाती आयोगाचे अध्यक्ष नंदकुमार साय हनुमान यांच्या संदर्भात एक धक्कादायक विधान केले आहे. ‘हनुमान हे दलित नव्हते तर आदिवासी होते’ असल्याचे साय यांनी म्हटले आहे.

अनुसूचित जातींमध्ये हनुमान हे एक गोत्र असते. कुडूक या अनुसूचित जातीमध्ये तिग्गा नावाचे गोत्र आहे. ज्याचा अर्थ वानर असा होतो. तसेच अनुसूचित जातींमध्ये हनुमान आणि गिधाड अशी देखील गोत्रे आहेत, असे साय यांनी म्हटले आहे. प्रभू श्रीरामाने ज्या दंडकारण्यात सैन्य गोळा केले. त्यामध्ये अनुसूचित जातींचे लोक होते. त्यामुळे हनुमान हे दलित नव्हे तर अनुसूचित जातीचे होते, असे नंदकुमार साय यांनी म्हटले आहे.

Related posts

#Elections2019 : जाणून घ्या…जळगाव मतदारसंघाबाबत

News Desk

भाजप-सेनेच्या युतीसाठी स्थानिक पातळीवर ताकद लावा, कामाला लागा !

News Desk

शाहिद आफ्रिदीचे ‘चांदतारे’, सामनामधून ठाकरेंनी घेतला समाचार

News Desk