HW News Marathi
क्राइम

चार वर्षानंतर तलवार दाम्पत जेलबाहेर

गाझियाबाद(वृत्तसंस्था): आरूषी आणि हेमराजच्या हत्येप्रकरणी अलाहाबाद हायकोर्टाने निर्दोष ठरवल्यानंतर राजेश आणि नुपूर तलवार दाम्पत्याची आज कारागृहातून सुटका झाली. चार वर्षांनंतर हे दाम्पत्य कारागृहाबाहेर आले. कारागृहातील आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास तलवार दाम्पत्य कारागृहाबाहेर पडले कारागृहाबाहेर मोठ्या प्रमाणात पत्रकार व छायाचित्रकारांची गर्दी झाली होती. मात्र,कोणतीही प्रतिक्रिया न देता हे दोघे निघून गेले.आरुषीचे वडील राजेश आणि आई नुपूर या दोघांची नोव्हेंबर २०१३मध्ये गाझियाबादमधील दासना कारागृहात रवानगी करण्यात आली होती.

आरुषी-हेमराज हत्याकांड प्रकरणी विशेष सीबीआय कोर्टाने तलवार दाम्पत्याला २६ नोव्हेंबर २०१३ रोजी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. दरम्यान, तलवार दाम्पत्याने या शिक्षेला अलाहाबाद हायकोर्टात आव्हान दिले होते. १२ आॅक्टोबर रोजी या आव्हान याचिकेवर कोटार्ने निकाल दिला. तपासातील त्रुटी आणि सबळ पुराव्याअभावी हायकोर्टाने तलवार दाम्पत्याची या प्रकरणातून निर्दोष मुक्तता केली. आरुषीला तिच्या आईवडिलांनी मारले नाही, असे मतही कोर्टाने हा निकाल देताना नोंदवले. अशा प्रकरणात सुप्रीम कोर्टही इतकी कठोर शिक्षा देत नाही, असेही कोर्टाने यावेळी नमूद केले होते. दरम्यान, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आज तलवार दाम्पत्याची दासना कारागृहातून मुक्तता करण्यात आली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अकोला भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू

News Desk

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर विशेष सीबीआय न्यायालय आज देणार निकाल

Aprna

छोटा राजनचा शार्प शुटर अटकेत

News Desk