HW News Marathi
क्राइम

दादरमधील हत्येचे रहस्य उघडकीस

मुंबई । गेल्या आठवड्यात दादरच्या फुल मार्केटमध्ये मनोज मोर्ये या इसमाची दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी अंगावर गोळ्या झाडून हत्या केली होती. ही हत्या एकतर्फी प्रेमातून झाल्याचे उघडकीस झाले आहे. या हत्ये प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केले असून या हत्ये मुख्य सुत्रधार आरोपी राधेकृष्ण खुशवाह यांच्यासह राजेंद्र अहिरवाह आणि हेमंत खुशवाल अशा तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. राधेकृष्णने राजेंद्र आणि हेमंतल ५० हजार रुपयांची सुपारी देऊन मनोजची हत्या करण्यास सांगितले होते.

मुंबईत येऊन या दोघांनी मनोजची हत्या केली आणि आरोपी दिल्लीला फरार झाले. मुंबई पोलिसांनी आरोपींना दिल्लीहून अटक केले आहे. मनोजची पत्नी आणि राधेकृष्णा यांची मैत्री होती, ती मैत्री मनोजला मान्य नव्हती म्हणून मनोज पत्नीला घेऊन मुंबईला आला,अशी माहिती पोलिसांकडून मिळाली आहे. त्यानंतर ही मनोजच्या पत्नीचे आणि राधेकृष्ण एकमेकांच्या संपर्कात होते. राधेकृष्णला मनोजच्या पत्नीवर एकतर्फी प्रेम झाले होते. तिला मिळवण्यासाठी त्यांनी मनोज मोर्येची हत्या असल्याचे समजते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

गौरी लंकेश हत्येप्रकरणी बेळगावमधून आणखी एक जण ताब्यात

Gauri Tilekar

कथित 19 बंगला घोटाळा प्रकरणी उद्धव ठाकरेंच्या अडचणीत पुन्हा वाढ

Aprna

गणपती विसर्जन मिरवणुकीत तरूणावर चाकू हल्ला, तरूणाचा मृत्यू

News Desk
मुंबई

भावी पोलिसांसाठी मनसे आली धावून

News Desk

नवी मुंबई | राज्यभरातून पोलीस भरतीसाठी मुंबईत येणा-या ग्रामीण भागातील तरुणांचे नेहमीच हाल होतात. यावर अनेकदा बातम्या प्रसिद्ध केल्या जातात. आरोप प्रत्यारोप होतात मात्र कोणीही या तरुणांची मदत करताना दिसून येत नाही. मात्र यावेळी नवी मुंबईत पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणांच्या राहण्याच्या व्यवस्था करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना या तरुणांच्या मदतीला धावून आल्याचे चित्र सध्या नवी मुंबईत पहायला मिळत आहे.

नवी मुंबईत मनसे कार्यकर्ते गजानन काळे यांनी या पोलीस भरतीसाठी आलेल्या सुमारे ४०० ते ५०० मुला-मुलींची रहाण्याची व जेवण्याची व्यवस्था केल्यामुळे नवी मुंबई ग्रामीण बेरोजगार तरुणांसाठी मनसे धावून आली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ग्रामीण भागातून भरतीसाठी आलेल्या तरुणांना नेहमीच रात्रीच्या वेळी पदपथावर झोपावे लागते. दरवर्षीच्या या समस्यांवर तोडगा काढत मनसे कार्यकर्त्यांनी केलेली ही व्यवस्था सध्या नवी मुंबईत चर्चेचा विषय ठरली आहे.

Related posts

व्यापाऱ्यांना फटाका विक्री परवान्यासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत मुदत

News Desk

मराठा पक्ष स्थापनेचा घोषणा?

News Desk

दारुच्या नशेत बाथटबमध्ये बुडून अभिनेत्री श्रीदेवी यांचा मृत्यू | फॉरेन्सिक रिपोर्ट

News Desk