HW News Marathi
क्राइम

दारूबंदीसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिर-याला महिलांनी घातला घेराव

भुसावळ तालुक्यातील वांजोळा, मिरगव्हाण, यावल तालुक्यातील हिंगोणा व रावेर तालुक्यातील वाघोदा बुद्रुक येथील महिलांनी मंगळवारी दुपारी दारूबंदी करण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांना घेराव घालून निवेदन दिले आहे.

वाजोळ येथे मोठ्याप्रमाणोवर दारू विक्री होत असल्याने स्थानीक महिलांनी भुसावळचे सहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची भेट घेऊन गावातील गावठी दारुबंद करण्याची मागणी केली. निरीक्षक सूर्यकांत पाटील यांनाही त्यांनी निवेदन देऊन दारुबंदी झालीच पाहिजे यासाठी आग्रह धरला. रावेर वाघोदा येथील ट्रकभर महिलांनी भुसावळातील उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयात जाऊन दारुबंदीची मागणी केली. यावल आणि हिंगोणा येथील महिलांनी यावल येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका:यांना घेराव घालून संपूर्ण दारुबंदीची मागणी केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

 नायर रुग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरांसह सुरक्षारक्षकांना केली मारहाण

News Desk

सोशल मीडियातून खून केल्याची कबुली, आरोपी पोलिसांना सापडेना

News Desk

औरंगाबादमधील जैन मंदिरातून दोन किलो सोन्याची मूर्ती लंपास; पोलिसांकडून शोध सुरू

Aprna
देश / विदेश

गोरखपूरमध्ये ४८ तासांत आणखी ३० बालकांचा मृत्यू

News Desk

गोरखपूर : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ऑक्सिजन टँकअभावी ७० हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा ४८ तासांमध्ये ३० बालकांना जीव गमवावा लागला आहे. येथील बाबा राघवदास रुग्णालयात घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघात येणाऱ्या बाबा राघव दास रुग्णालय काही दिवसांपूर्वी ७० हून अधिक बालकांना जीव गमवावा लागला होता. या रुग्णालयात गेल्या ४८ तासांमध्ये ३० बालकांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तर गेल्या ७२ तासांत रुग्णालयातील तब्बल ६१ बालकांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्तान टाईम्सने ही आकडेवारी दिली आहे.

मेंदूचे विकार, न्युमोनिया, जंतू संसर्ग आणि नवजातांना भेडसावणाऱ्या विविध जीवघेण्या समस्यांनी या ३० तीन बालकांचा जीव घेतला आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णालयातील यंत्रणा कमी पडू लागली आहे. त्यामुळे सर्व बालकांवर उपचार करणे रुग्णालय प्रशासनाला शक्य झालेले नाही. २७, २८ आणि २९ ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये मेंदू विकारावरील उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्डातील ११ बालकांनी प्राण गमावले. याच काळात एनएनआयसीयू आणि जनरल वॉर्डमधील प्रत्येकी २५ मुले दगावली आहेत.

उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने रोगांचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रोगराई पसरुन मृतांचा आकडा वाढेल,अशी भीती व्यक्त होत आहे.

Related posts

कलम ४९७ वर सर्वोच्च न्यायालयाचे घटनापीठ आज देणार निकाल  

News Desk

सकारात्मक! देशात पहिल्यांदाच समलिंगी न्यायाधीश होण्याची शक्यता

News Desk

खलिस्तानी दहशतवाद्याला नांदेडमधून केली अटक

News Desk