HW News Marathi
शिक्षण

शिक्षणापासून दूर गेलेल्या वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दूरशिक्षण केंद्राची महत्त्वाची भूमिका – कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर

उत्तम बाबळे

नांदेड :- महाविद्यालयीन पातळीवर कार्यरत असलेले केंद्र संचालक व केंद्र समन्वयक यांनी दूरशिक्षण हि एक चळवळ आहे. ही जाणीव ठेऊन ती योग्य पध्दतीने राबविली पाहिजे. समाजातील शिक्षणापासून दूर गेलेल्या वर्गाला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी दूरशिक्षण केंद्राची महत्त्वाची भूमिका आहे, असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर यांनी केले.

विद्यापिठाच्या दूरशिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेल्या केंद्र संचालक व केंद्र समन्वयक यांच्या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे, दूरशिक्षण विभागाचे संचालक तथा कार्यशाळेचे आयोजक प्राचार्य डॉ. राम जाधव यांची उपस्थिती होती.

पुढे डॉ. विद्यासागर म्हणाले, दूरशिक्षणाला खूप महत्त्व आहे. या शिक्षण प्रवाहातून पदवी, पदव्युत्तर झालेल्या व्यक्ती आज मोठ्या मानाच्या हुद्यावर आहेत त्यामुळे आपल्या विद्यापीठातूनही अशाच व्यक्ती निर्माण व्हावेत यासाठी सर्वांच्या प्रयत्न्नांची गरज आहे. प्राध्यापकांमध्ये शिक्षणाबद्दल आणि विद्यार्थ्यांबद्दल आस्था असली तर अशा प्रकारचं वातावरण तयार होईल, कारण विद्यार्थ्यांच्या मनात तशी इच्छा निर्माण करण्याचे, त्यांना स्फूर्ती देण्याचे सामर्थ्य शिक्षकांत असते. त्यासाठी विद्यार्थ्यांचे प्रश्न समजून घ्या आणि ते सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा.

प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे यांनी आपल्या भाषणात या विभागाद्वारे नवनवीन अभ्यासक्रमात शिक्षण घेण्याची संधी विद्यार्थ्यांना उपलबध करून देण्यात यावी अशी अपेक्षा व्यक्त करून त्यासाठी शुभेच्छा दिल्या.

परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे म्हणाले, मी स्वतः दूरशिक्षण विभागातून एम.बी.ए. उत्तीर्ण झालो आहे. त्यामुळे दूरशिक्षणातील विद्यार्थ्यांनी स्वतःला आत्मसन्मान मिळविण्यासाठी प्रामाणिकपणे अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षेतही यश प्राप्त करता येऊ शकते, त्यामुळे या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा.

प्रास्ताविक दूरशिक्षण विभागाचे संचालक प्राचार्य डॉ. राम जाधव यांनी केले तर संचालन व आभार डॉ.दीपक कोंडावार यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी विष्णू भुसारे आणि बी. व्ही. शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

यशश्रीने गाठले यशशिखर

swarit

म.रा.पत्रकार संघ तालुका कार्यकारणी घोषीत

News Desk

अमेरिकेत शिक्षणासाठी दरवर्षी घ्यावी लागणार परवानगी

News Desk