HW News Marathi
शिक्षण

सर्जनशील मोफत कार्यशाळा

मुंबई | मंथन आर्ट फाउंडेशन, युवसेना आणि मंथन द स्कूल ऑफ क्रिएटिव्ह ऍडव्हर्टाइझ ऍण्ड आर्ट यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर गायडन्स प्रदर्शन आणि सेमिनार चे आयोजन करण्यात आले आहे. मे महिना संपत आला आहे. १० वी , १२ वी च्या परीक्षा झाल्या असल्या तरी आता आयुष्यात काय करायचे हा खूप मोठा प्रश्न त्यांच्या पुढे उभा असतो. या प्रश्नाचे काहीस हटके उत्तर विद्यार्थ्यांना या सेमिनारमध्ये मिळणार आहे. डॉक्टर,अभियंता यापेक्षा ही अजून खूप क्षेत्राची दालने तुमची वाट पाहत आहेत. त्यातील एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्ह क्षेत्र.

या क्षेत्रातील परीपुर्ण माहिती विद्यार्थ्यांना शेअर करण्यासाठी रवींद्र नाट्य मंदिर या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. ही कार्यशाळा २६ मे २०१८ ते २९ मे २०१८ या कालावधीत होणार असून कार्यशाळेचा प्रारंभ जाहिरात जगतातील महत्वपूर्ण नाव म्हणजेच भरत दाभोलकर आणि युवसेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. कार्यशाळा रोज दुपारी २.०० ते ७.०० या वेळेत होणार आहे. यावेळी शशिकांत गवळी, कल्पेश गोसावी ,तुषार मोरे, वासुदेव कामत, दिलीप यंदे,मंगेश कांगणे आदी मान्यवर मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यशाळेमध्ये उपयोजित कलांचा करियर म्हणून कसा विचार कराल, युआय यु एक्स डिझाईन, फाईन आर्ट, कमर्शियल फोटोग्राफी, कॉपीरायटिंग या विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे. बारावी पास-नापास, ग्रॅज्युएट पण आजही भविष्यातील करिअरच्या निर्णयापर्यंत न पोहोचलेल्या विद्यार्थ्यांसाठी, त्याचबरोबर सीईटी-यासारख्या एंट्रन्स परीक्षा प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना कला शाखेतील वास्तव व जबाबदारीची जाणीव करून देणारा हा कार्यक्रम असणार आहे.

वेळ आणि पैशांसोबतच विद्यार्थ्यांचा उत्साह कसा अबाधित राहील हे खूप महत्त्वाचे आहे. थोडक्यात काय तर लाईफ आणि करिअर हा काही आंधळी कोशिंबिरचा खेळ नाही तर तो आवड, कौशल्य आणि मार्केटची आवश्यकता म्हणजेच नोकरीची उपलब्धता यांचा सुरेख मेळ आहे. म्हणून या ऍडव्हर्टाइझिंग क्रिएटिव्ह करिअर मार्गदर्शन कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने विद्यार्थी व पालकांनी उपस्थित राहावे. मुलांवर काही लादण्याआधी या महोत्सवाला आवर्जून भेट द्यावी. तसेच मंथन आर्ट स्कूलच्या विद्यार्थ्यांचे वार्षिक प्रदर्शन पहावे असे आवाहन मंथन आर्ट फाउंडेशन यांच्याकडून विद्यार्थ्यांना करण्यात आले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बारावीचा निकाल जाहीर, राज्यात मुलींची बाजी

News Desk

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या ५३ जागा

News Desk

अर्गो इन्श्युरन्स अवेरनेस अॅवॉर्ड ज्युनिअर क्विज २०१८

News Desk
मुंबई

मुंबईकरांना यंदा पाणी कपातीचे नो टेन्शन

News Desk

मुंबई | या वर्षी मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात मात्र पावसाला विलंब झाला, तरी मुंबईकरांना यंदा पाणी कपातीचे नो टेन्शन. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अद्याप चांगला जलसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे जून महिन्यापर्यंत तरी पाण्याची चिंता नसल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये चांगला जलसाठा असल्याने, पुढच्या महिन्याभरातही कोणतीच पाणीकपात केली जाणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात ३ लाख ६० हजार दशलक्ष लीटर साठा आहे. तलावांमध्ये सध्या तीन लाख ६० हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तलावांमध्ये तीन लाख ६५ हजार दशलक्ष लीटर जलसाठा होता, तर अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा आणि मध्य वैतरणा तलावात सध्या २ लाख ७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे.

Related posts

मुंबईत एनटीपीसीच्यावतीने नो टोबॅको मोहिमेला सुरूवात

News Desk

उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी जाणार ‘वर्षा’ बंगल्यावर

swarit

मुंबईला पुन्हा हाय अलर्टचा इशारा

News Desk