HW News Marathi
मुंबई

मुंबईकरांना यंदा पाणी कपातीचे नो टेन्शन

मुंबई | या वर्षी मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. प्रत्यक्षात मात्र पावसाला विलंब झाला, तरी मुंबईकरांना यंदा पाणी कपातीचे नो टेन्शन. कारण मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये अद्याप चांगला जलसाठा उपलब्ध आहे, त्यामुळे जून महिन्यापर्यंत तरी पाण्याची चिंता नसल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये चांगला जलसाठा असल्याने, पुढच्या महिन्याभरातही कोणतीच पाणीकपात केली जाणार नसल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात ३ लाख ६० हजार दशलक्ष लीटर साठा आहे. तलावांमध्ये सध्या तीन लाख ६० हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत तलावांमध्ये तीन लाख ६५ हजार दशलक्ष लीटर जलसाठा होता, तर अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा आणि मध्य वैतरणा तलावात सध्या २ लाख ७ हजार दशलक्ष लीटर जलसाठा आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाईपलाईन फुटली , दोन मुलांचा मृत्यू

News Desk

विक्रोळी पुलावर अपघात, चार मुली जखमी

News Desk

फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर पुन्हा ‘राज’कारण

swarit