HW News Marathi
शिक्षण

जात पडताळणीच्या दाखल्यामुळे मागवर्गीय विद्यार्थ्यांची गळचेपी

मुंबई | व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी जात पडताळणीचा दाखला अनिर्वाय केल्यामुळे विद्यार्थ्यांना ऐन प्रवेश प्रक्रियेतुन बाहेर जावे लागत आहे. केवळ दंत वैद्यकीय अभ्यासक्रम आणि अभियांत्रिक अभ्यासक्रम वगळता उर्वरीत अभ्यासक्रमांकरिता प्रवेश घेताना तीन महीन्यांत जात पडताळणी दाखला सादर करण्याच्या मुदतीवर प्रेवश देण्यात येईल असे केळव मौखिक अश्वासन शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी दिले.

परंतु वस्तुस्थिती याच्या उलट असल्याचे दिसत आहे. महाविद्यालयांमध्ये जात पडताळणीचा दाखल आवश्यक असल्याचे सांगितले जात असुन सदर दाखला उपलब्ध नसल्यास General Category मधुन विदयार्थ्यांनी प्रवेश घ्या अन्यथा घेऊ नका असे सांगितले जात आहे. अद्याप शासनाने या संदर्भात कोणताच सरकारी निर्णय न घेतल्यामुळे विद्यार्थ्यांना अजुन तरी कोणत्याच प्रकारचा दिलासा मिळालेला नाही.

आमदार, नगरसेवक यांना जात पडताळणी प्रमाण पत्राबाबत ६ महिन्यांची मुदत दिली जाते मात्र विद्यार्थ्यांना ३ महिन्यांची असे का? असा सवाल सम्यक विद्यार्थी संघटनेने उपस्थित केला आहे. तरी या संदर्भात शासनाने लवकरात लवकर शासन परिपत्रक काढावे व जात पडताळणी प्रमाणपत्र सादरकरण्याकरिता ६ महिन्यांची मुदत देऊन विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमधे प्रवेश द्यावा अशी मागणी सम्यक विद्यार्थी संघटनेने केली आहे. त्याचप्रमाणे जात पडताळणी प्रमाणपत्र देण्याचे काम जलद गतीने व्हावे व तसे आदेश संबधित विभागाच्या अधिकार्‍यांना देण्यात यावेत तशा आशयाचे शासनाने परिपत्र काढावे अशी देखील मागणी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्याकडे सम्यक विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आली आहे.

 

Related posts

पुणे विद्यापीठाकडून इंडियन हिस्ट्री काँग्रेसचे अधिवेशन रद्द

News Desk

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात सिध्दांत आणि व्यवहार’ विषयावर चर्चासत्र

News Desk

अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी लिपीक संवर्गीय प्रशिक्षणाची संधी

News Desk
मुंबई

आझाद मैदान येथे माथाडी कामगारांचे बेमुदत उपोषण

swarit

मुंबई | राज्य शासनाच्या कामगार, पणन व सहकार, उद्योग व अन्य खात्याअंतर्गत माथाडी कामगारांशी संबंधित प्रलंबित मागण्यांसाठी सोमवारपासून माथाडी कामगारांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. आज आझाद मैदान येथे माथाडी, ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियनचे नेते नरेंद्र पाटील यांनी बेमुदत उपोषण पुकारले आहे. माथाडी बोर्डाच्या टोळीचे मुकादम आणि उपमुकादम व कार्यकर्त्यांच्या नवी मुंबई येथील बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. अनुभवी प्रमुख कामगार नेत्यांना समितीवर सदस्य म्हणून नेमून माथाडी कामगारांसाठी सल्लागार समितीची पुनर्रचना करावी ही मागणी शासनाकडे अद्याप प्रलंबित आहे.

शासनाने राज्यातील ३६ माथाडी मंडळांचे एकच माथाडी मंडळ करण्याच्या घोषणेला सर्वच माथाडी कामगार संघटनांनी कडाडून विरोध केला होता. आश्वासन देणाऱ्या सरकारने अद्याप एकच मंडळ करण्याचा निर्णय डावलला नसल्यामुळे कामगार संघटनांमधून तीव्र नाराजी व्यक्त करत उपोषणाचा निर्णय घेतला आहे. माथाडी मंडळाच्या कार्यालयीन सेवेत कामगारांच्या मुलांना प्राधान्य द्यावे तसेच शासनाने लवकरच माथाडी कामगारांचे प्रश्न सोडवून मंडळावर पूर्णवेळ अध्यक्ष व सचिवाची नेमणूक करावी . माथाडी कायदा व कामगारांचे हित डावलणारे निर्णय रद्द केले नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

Related posts

जाणून घ्या…बेस्ट प्रशासनाच्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे

News Desk

फिलिपिन्सच्या ‘त्या’ नागरिकाचा मृत्यू कोरोनामूळे झाला नव्हताच…

swarit

राहुल गांधी मुंबईमध्ये दाखल, शिवडी न्यायालयात हजर राहणार

News Desk