HW News Marathi
शिक्षण

महाविद्यालयांमधील प्रवेशामुळे लोक त्रस्त, शनिवारी विशाल मोर्चा

मुंबई | अल्पसंख्याक महाविद्यालयांमधील प्रवेशाची सामान्य प्रक्रिया बाजूला ठेवल्यामुळे हजारो लोक त्रस्त आहेत. कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये 11 वीमध्ये प्रवेश न मिळाल्यामुळे उच्च गुण मिळवणारे विद्यार्थी व त्यांचे पालक शनिवारी आपल्या मागण्या घेऊन आमदार मंगल प्रभात लोढ़ा ह्यांच्या नेतृत्वात बाल भवनावर शिक्षण उप महासंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढतील. आमदार लोढ़ा ह्यांची मागणी आहे की, सरकारने ह्या संदर्भात उच्च गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हक्कांचे संरक्षण उच्च न्यायालयात करावे.

विशेष म्हणजे जूनियर महाविद्यालयांमध्ये अल्पसंख्याक कोट्याअंतर्गत कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाही 11 वीत पहिले प्रवेश दिला जात आहे व त्याच वेळी दहावीत उत्तम गुण मिळवणा-या प्रतिभावान विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत नाही आहे. शनिवारी ह्या संदर्भात आमदार मंगल प्रभात लोढ़ा ह्यांच्या नेतृत्वामध्ये शनिवारी सकाळी 10.30 ला चर्नी रोड स्टेशन पश्चिम येथील बाल भवनामध्ये उप महासंचालकांच्या कार्यालयावर मोर्चा काढला जाईल व त्यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी- विद्यार्थिनी व पालक सहभागी होतील. तिथून शिक्षण सचिवांच्या कार्यालयामध्ये एक प्रतिनिधी मंडळ जाईल व सरकारला निवेदन देईल. आमदार लोढ़ा ह्यांनी मागणी केली आहे की, सरकारने ह्यावर तत्काळ योग्य तो उपाय करावा. दक्षिण मुंबईमध्ये बहुतांश महाविद्यालये अल्पसंख्यांक आहेत. उच्च न्यायालयाच्या आदेशाचा बहाणा करून कमी गुण मिळालेल्या अल्पसंख्य विद्यार्थ्यांना तिथे पहिल्यांदा प्रवेश दिला जात आहे.

ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला बाजूला ठेवल्यामुळे उच्च गुण मिळवलेले विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत तर कमी गुण मिळालेले अल्पसंख्य विद्यार्थी अल्पसंख्याक महाविद्यालयांमध्ये आधी प्रवेश घेत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये मोठी नाराजी आहे. आमदार लोढ़ा ह्यांनी शिक्षण मंत्री विनोद तावडेंना निवेदन दिले आहे की, ज्या प्रकारे ते नेहमी विद्यार्थ्यांच्या हितांसाठी तत्पर असतात, त्याच तत्परतेने व जागरूकतेने त्यांनी ह्या प्रकरणावरही उच्च न्यायालयात विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने सरकारची बाजू मांडावी जेणेकरून त्रस्त लोकांची ह्या त्रासातून सुटका होईल.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

सीतेला रामाने पळवले, गुजरात बोर्ड

News Desk

मुंबई विद्यापीठाचे निकाल पाच दिवसांत लावतो

News Desk

कायद्याच्या अंमलबजावणीला घरातून सुरुवात करा

News Desk
शिक्षण

सम्यक विद्यार्थी संघटनेची मुंबई विद्यापीठात निदर्शने

News Desk

मुंबई | विश्व विद्यालय अनुदान आयोग बरखास्त करण्याच्या केंद्र सरकार च्या निर्णया निषेधार्थ सम्यक विद्यार्थी आंदोलन या विद्यार्थी संघटनेच्या वतीने मुंबई विद्यापीठा समोर तीव्र निदर्शने करण्यात आली. विश्व विद्यालय अनुदान आयोग बरखास्त न करता त्या मध्येच आवश्यक सुधारणा करण्यात याव्या अशी मागणी करत सम्यक विद्यार्थी संघटनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय शिक्षण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याद्वारे मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु यांना निवेदन देण्यात आले.

प्रस्तावीत उच्च शिक्षण आयोगामध्ये अनेक त्रुटी असून सदर उच्च शिक्षण समितीतील सदस्यांची नेमणुक केंद्र सरकार करत असल्याने मोठ्या प्रमाणात नोकरशाह आणि राजकारण्यांचा यामध्ये हस्तक्षेप राहणार असून सदर समितीला मुक्तपणे काम करता येणार नाही. या उलट सरकारधार्जीन ही समिती राहणार असुन पुर्णता केंद्र सरकारच्या प्रभावाखाली उच्च शिक्षण समिती राहील. उच्च शिक्षण ओयोग गठीत करण्याचा निर्णय हा शिक्षण व्यवस्थेला एककेंद्रीकरणाचा असून हा निर्णय सरकारने एकाधिकारशाहीने घेतला आहे. असा अारोप सम्यक विद्यार्थी संघटनेचे मुंबई अध्यक्ष अक्षय गुजर यांनी केला.

विश्व विद्यापीठ अनुदान आयागाचे आर्थिक अधिकारांची स्वायत्ता काढुन ते केंद्र सरकारकडे राहणार असल्याने महाविद्यालयांना अनुदान देताना निपक्षपातीपणाचा या ठीकाणी लवलेश ही राहणार नाही असे मत मुंबई सचिव आकाश दोडके यांनी मांडले.

त्याचप्रमाणे यापुर्वी महिविद्यालयांना संलग्नता देण्याचे अधिकार राज्यांना होते. परंतु सलंग्नता आता थेट उच्च शिक्षण आयोगाकडून मिळवावी लागणार. सदर अटी केवळ एककेंद्रीकरण दर्शवते असे मत सम्यक विद्यार्थी संघटनेचे प्रतीक साबळे(ठाणे अध्यक्ष) यांनी व्यक्त केले.

Related posts

सीबीएसईचा निकाल ८३.०१ टक्के 

News Desk

तुमच्या पगारापेक्षा बाराशेपट अधिक पगार घेतात सीईओ

News Desk

शास्त्रीय कला , चित्रकला व लोककला सहभाग घेणा-या विद्यार्थ्यांना वाढिव गुण देणार :  राज्य शिक्षण मंडळ  

News Desk