HW News Marathi
शिक्षण

आर्ट ऑफ सक्सेस या मार्गदर्शन शिबीराचे ५ जुलै रोजी आयोजन

मुंबई | चाणक्य IAS अकॅडमी नवी दिल्ली पुणे केंद्र यांनी UPSC ची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता ५ जुलै रोजी संध्याकाळी ६ वाजता, पुणे येथील गणेश कला क्रीडा मंच येथे उपयुक्त असे मोफत मार्गदर्शन शिबीराचे आयोजन केले आहे. मार्गदर्शन शिबीराचे नाव आर्ट ऑफ सक्सेस असून स्वतः चाणक्य संस्थेचे संस्थापक ए.के.मिश्रा या विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी, वेळेचे नियोजन आणि इतर अनेक महत्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शन करणार आहेत.

स्पर्धा परीक्षेचे शिक्षण जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे जेणेकरून विद्यार्थ्यांना सर्वोत्तम आणि दर्जेदार शिक्षण प्राप्त घेता येईल. तसेच त्यांच्या पालकांच्या सुद्धा पाल्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या विविध प्रकारच्या शंकांचे निरसन व्हावे तसेच ही परीक्षा देणाऱ्या मुलांचा स्पर्धा परीक्षांमध्ये सर्वांगीण विकास व्हावा याकरिता या सत्राचे आयोजन करण्यात आले आहे. अशी माहिती मुंबईत शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना संस्थेचे केंद्र व्यवस्थापक अमित मेढेकर यांनी दिली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

परिक्षेत पास करण्यासाठी विद्यार्थीनीकडे शिक्षकाने केली शरीरसुखाची मागणी

News Desk

राज्यसेवा पूर्व परिक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्माक आदेश    

News Desk

सीबीएसई १० वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

News Desk
देश / विदेश

देशाची वाटचाल गुलामगिरीकडे- राहुल गांधी

News Desk

वृत्तसंस्थाः सध्या एकापाठोपाठ एक करून देशातील लोकशाही संस्थांवर पद्धतशीरपणे ताबा मिळवला जात आहे. यामध्ये पंतप्रधान, सरकारी अधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग आहे. हे सर्व मिळून देशाला गुलामगिरीकडे ढकलत असल्याची जहरी टीका कॉँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी बेंगळुरू येथे केली. कर्नाटक सरकारकडून बंगळुरू येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘क्वेस्ट फॉर इक्विटी’ या कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. आपल्या राजा नागडा आहे, परंतु ते मान्य करण्याची कोणा अंध भक्ताची तयारी नाही, कारण भक्त त्याच्या प्रेमात आकंठ बुडले आहेत, असे म्हणत त्यांनी मोदी यांच्यावर जहरी टीका केली हे.

सध्या देशात खरं बोलणाऱ्यांता गळा दाबला जात असून गरीब व दुर्बल घटकांना नामोहरम केले जात आहे. भाजप हे बेगडी सरकार आहे. हुकुमशाहीकडे देशाला नेण्याची भाजप व संघाची चाल असून त्यानुसार सर्व खटाटोप सुरू असल्याचेही राहुल यांनी या वेळी म्हटले आहे.

Related posts

चुकीची माहिती दिल्याने मुख्यमंत्र्यांसह सुप्रिया सुळे, आदित्य ठाकरेंच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची फेरपडताळणी ?

News Desk

ड्रायव्हींग लायसन्स मिळण्यासाठीची शिक्षणाची मर्यादा शिथिल

News Desk

राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तारसाठी काँग्रेस नेते दिल्ली दाखल, पक्षश्रेष्ठींशी करणार चर्चा

News Desk