HW News Marathi
शिक्षण

सीबीएसई १० वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(सीबीएसई) १० वी च्या परीक्षेचा निकाल उद्या संध्याकाळी ४ वाजता जाहीर होणार आहे. २०१७-१८ या शैक्षिणक वर्षाचा दहावीचा मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे. सीबीएसईचा दहावीचा निकाल cbse.nic.in या वेबसाइटरवर पहिल्यांदा जाहीर करण्यात येणार असल्याचीही माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिका-याने दिली आहे.

१०वीचा पेपर फुटलेल्या विषयांच्या फेरपरीक्षा घेण्यात आली होती. परंतु दहावीच्या गणिताच्या पेपरची फेरपरीक्षा फक्त हरियाणा आणि दिल्लीतच घेण्यात आली होती. गेल्या आठवड्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या १२वी चा निकाल लागला. या निकालात गाझियाबादची मेघना श्रीवास्तव देशात पहिली आली आहे. यंदा सीबीएसईचा निकाल ८३.०१ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात १ टक्के वाढ झाली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विद्यार्थ्‍यांच्या वैचारिक क्षमतेत वाढ करण्‍यामध्‍ये शिक्षकांची महत्‍वपूर्ण भूमिका | महापौर

News Desk

शिष्यवृत्ती परिक्षेत ऋुतिका हाके लातुर विभागात अव्वल

News Desk

ठाणे महानगरपालिकेत अधिष्ठाता पदाची जागा

News Desk
मुंबई

‘खीळे मुक्त झाडे’ तरुणांची अनोखी मोहिम

News Desk

मुंबई | मुंबईमध्ये गेल्या तीन महिन्यापासून ‘खीळे मुक्त झाड’ ही मोहीम राबवली जात आहे. झाडांना खिळे मुक्त करण्यासाठी पुण्याच्या आंगोळीची गोळी या संस्थेने प्रामुख्याने पुढाकार घेतल्याचे पहायला मिळत आहे. आंगोळीची गोळी ही संस्था गेल्या ४ वर्षापासून प्रेम, बंधुभाव, त्याग, बचत या चार तत्वांवर आधारीत पाणी बचतयांसह अनेक सामाजिक उपक्रम राबवत आले. खिळेमुक्त झाडे हि मोहीम पुण्यात गेल्या तीन महिन्यांपासून सुरु असून मुंबईत या मोहिमेला १ एप्रिल पासून प्रारंभ झाला आहे.

या मोहिमेला मुंबईत अविनाश पाटील, सागर वाळके या दोन तरुणांनी सुरुवात केली आहे. या मोहीमेत एमएसडब्लू, बीएसडब्लू चे विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. दादर, कल्याण आणि डोंबिवली या ठिकाणी हि खिळे मुक्त झाड मोहीम राबविल्यानंतर ३ जून ला ही मोहिम विरार येथे राबविण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान या विद्यार्थ्यांना झाडांना खीळे, लोखंडी गज , स्क्रु ड्राइव्हर आणि लोखंडी पाण्याचे पाइप अशा विविध वस्तू झाडात आढळून आल्या आहेत . आता पर्यंत या मोहिमेत तरुणांनी १५० हून अधिक झाडे खिळेमुक्त केली आहेत. या झाडांना पडलेले खड्डे बुजविण्यासाठी मेनबत्ती वॅक्सचा वापर करण्यात येत आहे. यामुळे झाडांना कोणत्याही प्रकारची इजा होणार नाही तसेच किड लागणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे.

१९७० मध्ये मुंबईत ३५ टक्के झाडे होती त्या तुलनेत मुंबईत सध्या १३ टक्क्यांहून कमी झाडे असल्याचे इनडीयन इंस्टिट्यूट ऑफ सायन्सच्या रीसर्च मधून समोर आले आहे. परंतु सध्या लोकसंख्येच्या तुलनेत ३३ टक्के झाडे शिल्लक राहिली आहेत. मात्र हे प्रमाण मुंबईत अतिअल्प असून ४ व्यक्तींच्या मागे १ झाड अशी सध्या अवस्था आहे. मुंबईमध्ये या मोहिमेत अनेक संस्था एकत्र येऊन सध्या काम करत आहेत. स्वच्छ भारत अभियानाला अनुसरुन ही मोहीम राबविण्यात येत आहे. अंबरनाथमध्ये देखील हि मोहिम घेण्यात आली आहे. तसेच यापुढे देखील मोहीम मुंबई शहरात विविध सामाजिक संस्थांना एकत्र घेऊन करण्यात येईल अशी माहिती आंगोळीची गोळी संस्थेचे सदस्य तुषार वारंग यांनी दिली.

 

 

Related posts

वसूल केलेला GST परत करणार का?: उद्धव ठाकरे

News Desk

अमित शहा रतन टाटांच्या भेटीला

News Desk

गणेशोत्सवापूर्वी मुंबईतील सर्व खड्डे भरणार,आयुक्तांचे गणेशोत्सव मंडळांना आश्वासन

News Desk