HW News Marathi
शिक्षण

सीबीएसई १० वीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार

नवी दिल्ली | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या(सीबीएसई) १० वी च्या परीक्षेचा निकाल उद्या संध्याकाळी ४ वाजता जाहीर होणार आहे. २०१७-१८ या शैक्षिणक वर्षाचा दहावीचा मंगळवारी निकाल जाहीर होणार आहे. सीबीएसईचा दहावीचा निकाल cbse.nic.in या वेबसाइटरवर पहिल्यांदा जाहीर करण्यात येणार असल्याचीही माहिती केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिका-याने दिली आहे.

१०वीचा पेपर फुटलेल्या विषयांच्या फेरपरीक्षा घेण्यात आली होती. परंतु दहावीच्या गणिताच्या पेपरची फेरपरीक्षा फक्त हरियाणा आणि दिल्लीतच घेण्यात आली होती. गेल्या आठवड्यात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळा(CBSE )च्या १२वी चा निकाल लागला. या निकालात गाझियाबादची मेघना श्रीवास्तव देशात पहिली आली आहे. यंदा सीबीएसईचा निकाल ८३.०१ टक्के लागला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा निकालात १ टक्के वाढ झाली आहे.
Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

बारावी पास असणा-यांना रेल्वेत नोकरीची संधी

News Desk

व्यवसाय परीक्षेचा अर्ज भरण्याबाबत नांदेड आयटीआयमध्ये प्रशिक्षण                                                                                

News Desk

अर्गो इन्श्युरन्स अवेरनेस अॅवॉर्ड ज्युनिअर क्विज २०१८

News Desk
देश / विदेश

सत्यपाल मलिक यांची जम्मू-काश्मीरच्या राज्यपाल पदी नियुक्ती

swarit

श्रीनगर | सत्यपाल मलिक यांनी आज जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी (२१ ऑगस्ट) जम्मू-काश्मीरच्या राज्यपालापदी सत्यपाल मलिक यांच्या नावाची घोषणा केली होती. याआधी एन. एन. व्होरा हे जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते. त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला.

सत्यपाल मलिक यांचा अल्पपरिचय

सत्यपाल मलिक यांचा जन्म उत्तर प्रदेशातील बागपतमधील एका गरीब कुटुंबात झाला. त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण मेरठ कॉलेजमध्ये पूर्ण झाले आहे. १९७४ ते १९७७ या काळात मलिक हे उत्तर प्रदेश विधानसभेत आमदार होते. यानंतर १९८०-८६ आणि १९८६-१९९२ या काळात राज्यसभेतवर खासदार होते. १९८९ साली अलिगढ मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले होते. तसेच मलिक यांनी बिहार आणि ओडिसा या राज्याचे राज्यपालपदी सांभाळली आहे.

Related posts

#AyodhyaJudgment : वादग्रस्त जमीन रामलल्लाचीच, मुस्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा

News Desk

पंतप्रधान मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अमित शहा गृहमंत्री तर राजनाथ सिंह संरक्षण मंत्री

News Desk

राफेल, राम मंदिर, कावेरीवरून संसदेत गदारोळ

News Desk