HW News Marathi
मनोरंजन

या अभिनेत्रीकडे झाली होती शारीरिक सुखाची मागणी

मुंबई– मराठी चित्रपटसृष्टीत काम करण्यासोबतच दक्षिणात्य सिनेमांमध्ये हॉट अंदाजात दिसलेली अभिनेत्री नेहा पेंडसे हिने आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनेत्री नेहा पेंडसे हिची लाइफ ओके या चॅनलवरील ‘मे आय कम इन मॅडम’ ही सिरीयल सध्या खुप गाजत आहे. याच कार्यक्रमाच्या प्रसिद्धीसाठी लखनऊमध्ये पोहचलेल्या नेहा पेंडसे हिने काही धक्कादायक गोष्टी शेअर केल्या आहेत.

अभिनेत्री नेहा पेंडसे हिने Dainikbhaskar.com ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अनेक गोष्टी शेअर केल्या आहेत. नेहा पेंडसेला सिनेमांत काम करण्यासाठी कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला असल्याची धक्कादायक माहितीही दिली आहे. पाहूयात नेहा पेंडसेने आपल्या मुलाखतीत काय म्हटलं आहे ते… नेहानेम्हटले की, माझं बँकग्राऊंड सिनेमाशी संबंधित नव्हतं, त्यामुळे मला अनेकदा कास्टिंग काऊचचा सामना करावा लागला. अनेकदा मला शारीरिक संबंध ठेवण्यासाठी ऑफर्स आल्या होत्या मात्र, मी स्पष्ट नकार दिला. ज्यांनी अशा ऑफ

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

विसर्जनाला जाताय तर, हे वाचा !

News Desk

Ganesh Chaturthi 2018 | मुंबईत हिऱ्यामध्ये अवतरले बाप्पा

News Desk

महिला दिनी या पुरूषाला मिळणार,’सर्वोत्कृष्ट आई’चा सन्मान…

Arati More
देश / विदेश

नागरिकतेवर प्रश्न उपस्थित करणे यासारखे दुर्दैव नाही – हमीद अन्सारी

News Desk

नवी दिल्ली – जमावांकडून एखाद्या निष्पाप व्यक्तीची निर्घृणपणे करण्यात येणारी हत्या, ‘घरवापसी’, यांसारख्या घटना घडत असतील, तर ही भारतीय मूल्य कमकुवत होत असल्याची लक्षणे आहेत. तुमच्या भारतीय नागरिकतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाणे, यासारखी दुसरी दुर्दैवी घटना नाही, अशा शब्दांत मावळते उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

सलग दुसऱ्यांदा उपराष्ट्रपतिपद भूषवलेल्या अन्सारी यांचा कार्यकाळ आज गुरुवारी संपत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यसभा टीव्हीने त्यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी देशात सध्या सुरू असलेल्या घडामोडीवर भाष्य केले.

‘देशातील मुस्लिम समाजामध्ये सध्या भीती आणि असुरक्षेतेची भावना आहे. मुस्लिम समाजाकडे संशयाने पाहिले जाते. देशातील वेगवेगळ्या भागात मी गेलो, त्यावेळी मला असेच संशयाचे बोल ऐकायला मिळाले. बेंगळुरूला गेलो तेव्हाही मी हेच ऐकले आणि उत्तर भारतातून तर मोठ्या प्रमाणात असेचऐकायला मिळते,’ असेही अन्सारी म्हणाले. देशभर सुरू असलेल्या तीन तलाकवर बोलताना अन्सारी म्हणाले की, तीन तलाकच्या अनुचित प्रथेबद्दल दुमत होऊ शकत नाही. मात्र न्यायालयाने यात हस्तक्षेप करू नये, कारण कोणताही बदल समाजामधूनच होत असतो, असेही मत त्यांनी व्यक्त केले.

Related posts

मध्य प्रदेशमध्ये राजकीय भूकंप, ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाचा राजीनामा

swarit

राज ठाकरेंना गांभीर्याने घेण्याची गरज नाही !

swarit

भाजप सुकलेल्या तलावात कमळे फुलवीत, सामनातून भाजपवर टीका

News Desk