HW News Marathi
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण फोर्टिस रुग्णालयात दाखल

मुंबई | मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण गेल्या अनेक दिवसांपासून आजारी आहेत. मधल्या काळात त्यांची प्रकृती सुधारली होती. परंतु आता पुन्हा एकदा प्रकृती बिघडल्याने त्यांना बुधवारी मुलुंडमधील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. गेली अनेक वर्षे विजय चव्हाण मराठी चित्रपटसृष्टी गाजवत आहे. रंगभूमीपासून सिनेमांपर्यंतच्या त्यांच्या सर्व भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. मोरूची मावशी, श्रीमंत दामोदर पंत या नाटकातील त्यांनी रंगविलेल्या भूमिका अत्यंत लोकप्रिय ठरल्या. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.

विजय चव्हाण यांचा अल्प परिचय

लालबागमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात विजय चव्हाण यांचा जन्म झाला. त्यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली. विजय चव्हाण यांच्या कारकिर्दीतील मोरूची मावशी हे सगळ्यात गाजलेले नाटक. ह्या नाटकासाठी पहिल्यांदा लक्ष्मीकांत बेर्डे यांना विचारण्यात आले होते. बेर्डे यांनी निर्मात्यांना विजय चव्हाण यांचेच नाव सुचविले. झपाटलेला, पछाडलेला अशा अनेक चित्रपटातील त्यांच्या भूमिका प्रचंड गाजल्या.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#IndianNavyDay : … म्हणून साजरा केला जातो ‘नौदल दिन’

News Desk

वसुबारस का साजरी करतात ?

News Desk

लालबागचा राजा मंडळात झालेल्या धक्काबुकी प्रकरणी धर्मादाय आयुक्त डिगेंची चौकशी

News Desk
देश / विदेश

पाकिस्तानकडून पुन्ह एकदा शस्त्रसंधी उल्लंघन, दोन जवान शहीद

News Desk

जम्मू-कश्मीर | जम्मूतील खौड परिसर अंतर्गत येणाऱ्या केरी सेक्टर आणि राजौरी जिल्ह्यातील सुंदरबानी परिसरातून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात येत आहे. या गोळीबारीला भारताकडून प्रत्युत्तर देताना भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत.

भारताच्या नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन करत आहे. गेल्या आठवड्यात पाकिस्तानेच्या गोळीबारीत महाराष्ट्रातील परभणीतील पालम तालुक्यातील कोनेरवाडी गावचे शिपाई शुभम मुस्तापूरे शहीद झाला होता. या गोळीबारीत चार जवान जखमी झाले होते. तसेच कश्मीरच्या पूँछ जिल्हात कृष्णाघाटी नियंत्रण रेषेवर पाकिस्ताकडून गोळीबारी केली होती. यात एक ऑफिसरसह तीन जवान जखमी झाले होते.

Related posts

संभाजीराजेंवर केलेल्या आक्षेपार्ह टिकेप्रकरणी अ‍ॅड गुणरत्न सदावर्तेंवर गुन्हा दाखल

News Desk

‘केवळ गांधी द्वेषातूनच ‘राजीव गांधी खेलरत्न’ पुरस्काराच्या नावात बदल!’ नाना पटोले

News Desk

विमानात मिळणार इंटरनेट, वायफाय

swarit