HW News Marathi
मनोरंजन

आलिया भट्टचा न्यूड फोटो व्हायरल!!!

मुंबई : बॉलिवूड तारका दीपिका पादुकोणपाठोपाठ बॉलिवूडची चुलबुली गर्लआलिया भट्ट हिचाही न्यूड फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

मॅक्झिम या सुप्रसिद्ध मॅगझिनच्या कव्हर पेजवर दीपिकाचा न्यूड फोटो प्रसिद्ध झाला होता. या फोटोत न्यूड दीपिका एका पाठमोऱ्या न्यूड मॉडेलसोबत दिसली होती. तिने एका पायाने त्याला कवटाळले होते. या कव्हरवर दीपिकाला‘सुपरवूमन’ संबोधले गेले होते. दीपिकाचा हा फोटो अनेकांसाठी धक्का होता. पण नंतर हा फोटो बनावट असल्याचे उघडकीस आले होते. संबंधित मॅगझिनने या प्रकाराविरोधात कठोर कारवाईचा इशारा दिला होता.

आता आलियाचा हा न्यूड फोटोही फोटोशॉपची करामत असल्याचे वाटते आहे. मात्रअद्याप आलियाने यांसदर्भात कुठलेही स्पष्टीकरणदिलेले नाही. आता आलिया यावर काय बोलते ते बघूच.

दरम्यान, आलिया लवकरच ‘राजी’चित्रपटात दिसणार आहे. पुढील वर्षी मे महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असून त्यातआलिया पाकिस्तानी अधिकाऱ्यावर प्रेम करणाऱ्या एका काश्मिरी मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. करण जोहरच्या प्रॉडक्शन हाऊसची निर्मिती असलेल्या याचित्रपटाचे दिग्दर्शन व लेखन गुलजार यांची मुलगी मेघना करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

#MeToo: सुभाष घई यांच्यावर गंभीर आरोप

News Desk

जाणून घ्या… दिवाळीच्या फराळमधील ‘अनारसे’ सोप्या पद्धतीने कसे कराल  

swarit

#MeToo : संस्कारी बाबूजीआलोक नाथचे सिन्टाचे सदस्यत्व रद्द 

News Desk
देश / विदेश

गोरखपूरमध्ये ४८ तासांत आणखी ३० बालकांचा मृत्यू

News Desk

गोरखपूर : उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये ऑक्सिजन टँकअभावी ७० हून अधिक बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा ४८ तासांमध्ये ३० बालकांना जीव गमवावा लागला आहे. येथील बाबा राघवदास रुग्णालयात घडलेल्या या धक्कादायक प्रकारामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मतदारसंघात येणाऱ्या बाबा राघव दास रुग्णालय काही दिवसांपूर्वी ७० हून अधिक बालकांना जीव गमवावा लागला होता. या रुग्णालयात गेल्या ४८ तासांमध्ये ३० बालकांनी अखेरचा श्वास घेतला आहे. तर गेल्या ७२ तासांत रुग्णालयातील तब्बल ६१ बालकांचा मृत्यू झाला आहे. हिंदुस्तान टाईम्सने ही आकडेवारी दिली आहे.

मेंदूचे विकार, न्युमोनिया, जंतू संसर्ग आणि नवजातांना भेडसावणाऱ्या विविध जीवघेण्या समस्यांनी या ३० तीन बालकांचा जीव घेतला आहे. रुग्णांची संख्या जास्त असल्याने रुग्णालयातील यंत्रणा कमी पडू लागली आहे. त्यामुळे सर्व बालकांवर उपचार करणे रुग्णालय प्रशासनाला शक्य झालेले नाही. २७, २८ आणि २९ ऑगस्ट या तीन दिवसांमध्ये मेंदू विकारावरील उपचारांसाठी तयार करण्यात आलेल्या वॉर्डातील ११ बालकांनी प्राण गमावले. याच काळात एनएनआयसीयू आणि जनरल वॉर्डमधील प्रत्येकी २५ मुले दगावली आहेत.

उत्तर प्रदेशात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने रोगांचा फैलाव होण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रोगराई पसरुन मृतांचा आकडा वाढेल,अशी भीती व्यक्त होत आहे.

Related posts

एकाच कुटुंबातील चार जणांची निर्घृण हत्या

News Desk

स्वातंत्र्य ही काश्मिरी जनतेची प्राथमिक मागणी | सैफुद्दीन सोझ

News Desk

सावधान! समाज माध्यमांमध्ये खोटी माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध होणार कठोर कारवाई

News Desk