HW News Marathi
मनोरंजन

तुम्हाला एका देशात आणखी किती स्वातंत्र्य हवे?

मुंबई | सध्या समाजात चोहोबाजूने विष पेरले गेले असून या परिस्थितीत लवकर सुधारणा होईल असे वाटत नाही. त्यामुळे मला माझ्या मुलांची चिंता सतावत आहे,’ अशी भीती प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी व्यक्त केली आहे. एका डिजिटल चैनला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. शहा यांच्या विधानंतर अभिनेता अनुपम खेर यांनी खरपूस समाजार घेतला आहे. अनुपम म्हणाले की, देशात इतके स्वातंत्र्य आहे की, इथे लष्करावर दगड भिरकावले जाऊ शकतात. हवाईदल प्रमुखाला शिव्याशाप दिल्या जाऊ शकतात. तुम्हाला एका देशात आणखी किती स्वातंत्र्य हवे?, अशा शब्दातशहा यांना उद्देशून टीका केली.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरात तथाकथित गोरक्षकांनी एका पोलीस अधिका-याची हत्या केली होती. त्या घटनेवर नसीरूद्दीन शहा यांनी भाष्य केले होते. भारतातील सद्यस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली होती. देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड राग येतो. मला माझ्या मुलांची चिंता वाटते. सध्या देशात गाईचा जीव माणसापेक्षा जास्त मौल्यवान झाला आहे. गाईचे प्राण पोलीस अधिकाऱ्यापेक्षाही जास्त महत्त्वाचे आहेत. समाजात विष पसरले आहे. या परिस्थितीची मला खूप भीती वाटते. अचानक जमावाने माझ्या मुलांना घेरले आणि तुम्ही हिंदू आहात की मुस्लिम असा प्रश्न त्यांना विचारला, तर काय होईल , अशा शब्दांमध्ये त्यांनी देशातील परिस्थितीबद्दल शहांनी नाराजी व्यक्त केली होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

FLASHBACK 2018 : आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

News Desk

नागराज मंजुळे आता मुख्य भूमिकेत दिसणार

Gauri Tilekar

दिवाळीचा पाडवा, साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त

News Desk