HW News Marathi
मनोरंजन

समाजात विष पेरले गेले !

नवी दिल्ली | सध्या समाजात चोहोबाजूने विष पेरले गेले असून या परिस्थितीत लवकर सुधारणा होईल असे वाटत नाही. त्यामुळे मला माझ्या मुलांची चिंता सतावत आहे,’ अशी भीती प्रसिद्ध अभिनेते नसीरुद्दीन शहा यांनी व्यक्त केली आहे. नसीरुद्दीन शहा यांनी त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल केला आहे. त्यात त्यांनी सध्याच्या सामाजिक परिस्थितीवर परखड असे भाष्य केले आहे.

३ डिसेंबरला बुलंदशहरात गोहत्येवरुन तणाव निर्माण झाला. ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. यामध्ये पोलीस निरीक्षकासह एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेबद्दल बोलताना नसीरुद्दीन शहांनी देशातील घडामोडींवरही भाष्य केले. ‘देशातील सध्याच्या परिस्थितीचा मला प्रचंड राग येतो. मला माझ्या मुलांची चिंता वाटते,’ असे शहांनी एका डिजिटल चैनलशी बोलताना म्हटले आहे.

‘उद्या माझ्या मुलांना जमावाने घेरले आणि त्यांना तू हिंदू की मुस्लीम असे विचारले तर त्यांच्याकडे त्याचे उत्तर नसेल, त्यामुळे मला माझ्या मुलांची चिंता वाटतेय. कारण मी माझ्या मुलांना कधीच धार्मिक शिक्षण दिले नाही. चांगले आणि वाईटाचा धर्माशी काहीच संबंध नसतो,’ असे शहा यांनी म्हटले आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

“माझा समस्त भावांनो आणि भगिणींनो”, नवाजुद्दीनचे मराठीत ट्विट

swarit

शाहरुखला भेटता आले नाही म्हणून फॅनने स्वतःवर केले ब्लेडने वार

News Desk

पारंपरिक तिळाच्या वड्या

News Desk
राजकारण

आम्हाला आघाडीत घेण्याचा प्रयत्न हा केवळ त्यांचा दिखावा !

News Desk

नवी दिल्ली | “काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेसाठीचे जागावाटप आधीच पूर्ण झालेले असून त्यांचा आम्हाला आघाडीत घेण्याचा प्रयत्न हा केवळ दिखावा आहे”, असे भारिपा बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी सर्व विरोधी पक्षांसह एकत्र येऊन गेल्या अनेक महिन्यांपासून काँग्रेसकडून महाआघाडी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु आहेत. परंतु काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न हा निव्वळ फार्स असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी प्रकाश आंबेडकर यांचा भारिपा बहुजन महासंघ असदुद्दीन ओवेसींच्या एमआयएमसोबत एकत्र आला आहे. दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीच्या सामील करून घ्यायचे असले तरी त्यांना भारिपा बहुजन महासंघाची एमआयएमशी असलेली आघाडी मान्य नाही. त्यामुळे भारिपा बहुजन महासंघाला महाआघाडीत सामील व्हायचे असेल तर त्यांना एमआयएमशी असलेली त्यांची आघाडी तोडावी लागेल.

Related posts

कलम ३७० रद्द केल्यानंतर पंतप्रधान मोदी देशातील जनतेला करणार संबोधित

News Desk

विधिमंडळातील राजदंड मतदारसंघात नेण्यासाठी मला परवानगी द्या !

News Desk

चहाचा रिकामा कप देणाऱ्याच्या हातात देशाची सत्ता, मागासवर्गीय असणे अभिशाप

News Desk