HW News Marathi
मनोरंजन

आषाढ महिन्यातल्या दीपपूजेविषयी थोडक्यात… 

गौरी टिळेकर | आषाढी अमावस्येनंतर हिंदूं धर्मात पवित्र मानला जाणारा श्रावण महिना सुरु होतो. ह्या श्रावण महिन्याचे स्वागत करण्यासाठी आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच आषाढी अमावास्येच्या दिवशी ‘दीपपूजा’ साजरी केली जाते. ह्या दिवसाला दीप अमावस्या असेही म्हणतात. दिव्यांच्या प्रकाशाने जीवनातील सर्व वाईट गोष्टी नष्ट होऊन नव्याने जीवन प्रकाशमान व्हावे अशी या मागची भावना असते.

दीप आमावस्येच्या दिवशी लोकं आपल्या घरांची साफसफाई करून घर सजवतात. घरातील सर्व प्रकारचे दीवे, समया, निरांजने, लामण दिवे स्वच्छ करून सजविले जातात. दीप अमावास्येच्या संध्याकाळी लोकं घरापुढे रंगीबेरंगी रांगोळ्या काढून मध्यभागी ओळीने या सजविलेल्या दिव्यांची आरास करतात. त्यावर हळदी –कुंकू, अक्षता, फुले वाहून त्या दिव्यांनी देवाची आरती करून नैवेद्य दाखवला जातो. ही पूजा इष्ट देवतेला आणि पंचमहाभूतांना अर्पण केली जाते. काही लोकं ह्या दिवशी लक्ष्मी, सरस्वती आणि पार्वती ह्या देवतांचीही पूजा करतात. दीप अमावास्येची ही संध्याकाळ दिवाळीतल्याच दिवसासारखी भासते. ही दिपपूजा अष्ट ऐश्वर्य प्रदान करते अशी लोकांची धारणा आहे.

खरेतर अमावस्या म्हणजे अंधाराचा दिवस ज्याच्याकडे कायमच एका नकारात्मक दृष्टीने पाहिले जाते. परंतु दीपअमावास्येला ह्या अंधारावर आणि नकारात्मकतेवर विजय मिळवून लोक नव्या साकारात्मकतेने नव्या महिन्याचे स्वागत करतात. श्रावण महिन्यात व्रत-वैकल्ये, सणवार असतात. हिंदू धर्मात हा महिना अत्यंत पवित्र मानला जातो. त्यामुळे विषेश सत्यनारायण पुजेसारख्या पुजेंचे आयोजन केले जाते. अतिशय धार्मिक आणि प्रसन्न वातावरण या महिन्यात पाहायला मिळते. श्रावणातील ऊन-पावसाचे खेळ, हिरवागार निसर्ग मन मोहून टाकतो. या महिन्याचे स्वागतहि सकारात्मकतेने करण्यासाठी दीप अमावस्या साजरी केली जाते.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘द ऍक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर’ चित्रपटाच्या दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टे यांना अटक

swarit

प्रसिद्ध अभिनेते सतीश कौशिक यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Aprna

विजय चव्हाण यांच्या निधनाने महाराष्ट्राने अष्टपैलू अभिनेता गमावला | तावडे

News Desk