HW News Marathi
मनोरंजन

‘भाई’ चित्रपटाला स्क्रिन न मिळणे हे दुर्दैव

मुंबई | महाराष्ट्राला हसवण्याचं आणि हसवता हसवता शहाणं करण्याचं काम ज्यांनी केले असे महाराष्ट्राचे लाडके पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे यांच्या जीवनावर आधारित चित्रपट भाई शुक्रवारी(४ डिसेंबर) ला प्रदर्शित होत आहे. महाराष्ट्राची जनता आणि पुलंचे चाहते सुद्धा या सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. मात्र पुलंच्याच महाराष्ट्रात त्यांच्यावरील चित्रपटासाठी स्क्रिन आणि प्राइमटाइम उपलब्ध नाही. मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरांमध्ये पुंलंच्या चित्तपटाला स्क्रिन उपलब्ध न होने यासारखे दुर्दैव नाही.

महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वाची एक कलाकृती येत असताना त्याचे स्वागत व्हायला हवे. पुण्यामध्ये पुलंचं दीर्घकाळ वास्तव्य होतं. तिथेही त्यांच्यावरच्या सिनेमाला स्क्रीन्स मिळू नये ही अत्यंत लाजीरवाणी बाब आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक महेश मांजेरकर यांनी याबाबत खंत व्यक्त केली आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली खंत बोलून दाखवली. सिम्बा’ चित्रपटाच्या वितरकांचा दबाव चित्रपटगृहांच्या मालकांवर येत आहे त्यामुळे अनेकांनी ‘भाई’ सिनेमा दाखवण्यास नकार दिला आहे. वितरकांच्या दबावामुळे इच्छा असून चित्रपट दाखवता येत नाही अशा कोडींत मालक सापडले असल्याचे बोलले जात आहे. भाई- व्यक्ती आणि वल्ली’ हा पु.ल. देशपांडे यांच्या आयुष्यवर आधारीत चित्रपट असून हा सिनेमा दोन भागांमध्ये येणार आहे. त्यातील पहिला भाग शुक्रवारी(४ जानेवारी) प्रदर्शित होत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

विधानसभा निवडणुकीत विरोधकांचा ढोल फुटणार | गिरीश महाजन

News Desk

दिवाळीचा पाडवा, साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त

News Desk

आगमन बाप्पाचे | इको फ्रेंडली बाप्पा, दादरकरांमध्ये पेणच्या गणेश मुर्तींचे विषेश आकर्षण

News Desk