HW News Marathi
मनोरंजन

भारतीय संघाचा दारुन पराभव २-०ने मालिका गमावली

सेंच्युरियन – दक्षिण आफ्रिके विरुद्ध सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा दारुन पराभव झाला. दुसऱ्या सामन्यातही आफ्रिकेने १३५ धावांनी भारतावर विजयी मिळवला. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत दक्षिण आफ्रिकेने २-०ने आघाडी घेतली आहे. आफ्रिकेने भारतासमोर २८७ धावांचे आव्हान दिले होते. पण, भारतीय संघाचा दुसरा डाव १५१ धावातच आटोपला.

दक्षिण आफ्रिकेकडून एन्गिडीने चांगली गोलंदाजी करुन सहा विकेट घेण्यात यशस्वी झाला. रबाडाने तीन गडी बाद करुन त्याला चांगली साथ दिली. कालच्या ३ बाद वरुन पुढे आज डाव पुढे सुरु झाल्यानंतर चेतेश्वर पूजारा आणि पार्थिव पटेल १९ धावांवर रबाडाने मॉर्केलकरवी झेलबाद केले. भारतीय संघाला ६५ धावाच तंबूत परतला पाठवून आफ्रिकेने सामन्यावर पकड घट्ट केली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘वडिल-मुली’च्या नात्याला समर्पित करणारे गाणे !

News Desk

#IndependenceDay : मोदींचा बलुचिस्तानवरून पाकिस्तानवर हल्लाबोल !

News Desk

मोबाईलवर चित्रित करण्यात आलेल्या चित्रपटांनाही मिळणार अनुदान

News Desk
मुंबई

आमदार बच्चू कडू यांना एक वर्षांची शिक्षा

swarit

अमरावती – अचलपूरचे अपक्ष आमदार आणि प्रहार युवा संघटनेचे प्रमुख बच्चू कडू यांना वाहतूक पोलिसाला मारहाण प्रकरणी एक वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. अचलपूर सत्र न्यायालयाने एक वर्षे कारावास आणि ६०० रुपये दंड ठोठावला आहे. वाहतूक पोलीस इंद्रजीत चौधरीला आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.

‘पोलिसांनी योग्य पद्धतीने वाहतूक नियंत्रित न केल्यामुळे त्या परिसरात अनेक अपघात झाले आहेत. यासंदर्भात लोकप्रतिनिधी म्हणून विचारले असता. या पोलिसांनी उद्धटपणे उत्तर दिले असून त्यानंतर आमच्यात फक्त शाब्दिक वादावादी झाला पण, मारहाणीचा आरोप बच्चू कडू यांनी फेटाळला आहे.’

ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे तीन वेळा अपक्ष आमदार म्हणून निवडून गेले आहेत. प्रहार युवा संघटना स्थापन केली आहे. या संघटनेच्या माध्यमातून शेतकरी आणि विविध सामाजिक विषयांवर आंदोलन करत असतात.

Related posts

“कांग्रेस मुक्त भारत ते मोदी मुक्त भारत”- राज ठाकरे

swarit

आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे आंदोलन

swarit

श्रीदेवींचे पार्थिव आज दुबईहून मुंबईत दाखल होणार

swarit