HW News Marathi
मनोरंजन

प्रदर्शनाच्या आधीच ‘2.0’ वादाच्या भोवऱ्यात

मुंबई | सुपरस्टार रजनीकांत व अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा चित्रपट उद्या (२९ नोव्हेंबर) प्रदर्शित होणार आहे. मात्र, त्याआधीच दूरसंचार कंपन्यांनी सेन्सॉर बोर्डाकडे धाव घेतली आहे. ‘मोबाइल टॉवर आणि फोनची बदनामी होईल, अशी काही दृश्ये चित्रपटात चित्रित करण्यात आली आहेत. त्यामुळे जनसुमदायामध्ये याबाबत चुकीचा संदेश जाऊन त्याचा नकारात्मक परिणाम दूरसंचार क्षेत्रावर होऊ शकतो’, असा आक्षेप सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाने केला.

या चित्रपटाचा आत्तापर्यंत रिलीज झालेला टीजर, ट्रेलर व अन्य व्हिडिओ पाहून सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडियाने या ‘2.0’ च्या निर्मात्यांविरोधात तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटाला मिळालेले प्रमाणपत्र मागे घ्यावे, अशी याचिका सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडिया या संघटनेने सेन्सॉर बोर्डाकडे दाखल केली आहे.

‘2.0’ हा चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे. हा चित्रपट भारतातील आत्तापर्यंतचा सर्वाधिक महागडा चित्रपट आहे. हा चित्रपट बनविण्यासाठी ५०० कोटींहूनही जास्त खर्च करण्यात आला आहे. त्यामुळे आता सेन्सॉर बोर्ड याबाबत कोणती कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. सेल्युलर आॅपरेटर्स असोसिएशन आॅफ इंडिया एक अशासकीय संस्था आहे. एअरटेल, व्होडाफोन, रिलायन्स जिओ यासारख्या टेलिकॉम कंपन्या या असोसिएशनच्या सदस्य आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

#HappyBirthdayLataDi | लतादीदींच्या ‘या’ गाण्याने नेहरुंच्या डोळ्यात अश्रु दाटले

News Desk

‘मणिकर्णिका’ सिनेमाला ब्राम्हण सभेचा विरोध

News Desk

१४ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला ‘माऊली’

News Desk