HW News Marathi
मनोरंजन

‘कट कट’ करूनही त्यांचा ‘किस’ थांबेना!

मुंबई – काही वेळा एखाद्या सीनच शूट करताना अभिनेते इतके गुंग होऊन जातात की, त्यांना सभोवतालच्या परिस्थितीचे भानच राहात नाही. असाच काहीसा प्रकार ‘अ जेंटलमन’ सिनेमातील चुंबन दृश्याच्या चित्रिकरणावेळी घडला. या चुंबनात बॉलिवुड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस आणि अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा इतके गुंगून गेले की, दिग्दर्शक राज यांनी वारंवार ‘कट कट’ म्हणूनही ते एकमेकांचे ओठ चुंबतच राहिले.

सिनेमाचे दिग्दर्शक राज यांनी अलिकडेच एका प्रमोशनच्या कार्यक्रमात हे गुपित उघड केले. त्यामुळे जॅकलिन काहीशी बावचळून गेली. पण लगेचच सावरून घेत तिने म्हटले की, ‘खरे तर या सीनच्या वेळी राज यांना हा सीन अनेक अॅंगल्सने शूट करायचा होता आणि ते वारंवार सीन कट करत होते.’

या सिनेमातल्या ‘बंदूक मेरी लैला’ या गाण्याचं लॉन्च अलिकडेच झालं. या कार्यक्रमाच्या वेळी राज यांनी ही माहिती दिली.हा सिनेमा २५ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात चुंबन दृश्यांची बहार आहे. ज्या दृश्यावर सेन्सॉरची कात्री फिरल्याची चर्चा होती, ते दृश्यही सिनेमात आहे, कट केलेले नाही, असे राज यांनी स्पष्ट केले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

‘जे.जे.’मध्ये कोरिया-मुंबईतील ‘बियाँड द फ्रेम्स’ चित्रप्रदर्शन

News Desk

येशूंच्या जन्मदिनाचे महत्त्व…

News Desk

रजनीकांतचा ‘बाशा’ चित्रपट २२ वर्षांनी पुन्हा प्रदर्शित होणार

News Desk
देश / विदेश

साडेतीनशे कोटी रुपयांचा फाइन वसूल

News Desk

नवी दिल्ली- देशातील सर्वात मोठ्या स्टेट बँक ऑफ इंडियांने ग्राहकांच्या खिशातून सुमारे साडेतीनशे कोटी रुपये वसूल केले आहेत. हे पैसे केवळ देवाण-घेवाणपोटी वसूल करण्यात आलेल्या दंडातून मिळाले, हे विशेष. तुमच्या खात्यात तीन हजारांपेक्षा कमी रक्कम असेल तर तुम्हाला दंड द्यावा लागतो. तसेच इतर बँकेच्या एटीएममधून पैसे काढल्यास पैसे आकारले जातात. मेट्रो शहरात दीडशे रुपयापर्यंत दंड आकारला जातो. तुम्ही पैसे काढा किंवा काढू नका, तुम्हाला भूर्दंड भरावाच लागणार हे नवे बँकींक धोरण असल्याचे सध्या चित्र आहे. एकीकके शासन बँक व्यवहार करण्यास प्रोत्सहन देत असून दुसरीकडे ग्राहकांच्या खिशाला कात्री लावण्याचा धंदी सुरू आहे. एकट्या एसबीआय बँकेने ग्राहकांकडून दंडापोटी साडेतीनशे कोटी वसूल केले आहेत. इतर खासगी बँकांची ही रक्कमो कोट्यवधींच्या घरात जाण्याची शक्यता आहे.

Related posts

मोदींनीही आक्रमक होऊन चीनला धडा शिकवला पाहिजे !

News Desk

‘गुगल प्लस’ सेवा बंद करणार, ही आहेत कारणे

Gauri Tilekar

देशातील १० राष्ट्रीयकृत सार्वजनिक बँकांचे होणार विलीनीकरण

News Desk