HW News Marathi
देश / विदेश

लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली ! – जयंत पाटील

मुंबई। झालेली चूक सुधारत केंद्रसरकारने शेतकरीविरोधी असलेले कृषी कायदे मागे घेत असल्याची घोषणा आज सकाळी केली. लोकशाहीसमोर आज हुकूमशाही अखेर झुकली अशी प्रतिक्रिया देत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहे. देशातील शेतकऱ्यांचा विरोध असताना तीन काळे कृषी कायदे करून या देशातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा गुलामगिरीत ढकलण्याचा भाजप सरकारचा डाव होता. देशातील शेतकऱ्यांनी या विरोधात प्राणपणाने लढा दिला आणि त्यामुळेच आज देशातील या हुकूमशाही सरकारला अखेर शेतकऱ्यांसमोर झुकावे लागले.

शेतकऱ्यांच्या या लढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पहिल्यापासून बाजूने लढत होता असेही जयंत पाटील म्हणाले.

शेतकऱ्यांच्या बलिदानानंतर कायदे रद्द

जवळपास ६३० शेतकऱ्यांनी बलिदान दिल्यानंतर सरकारने हे कायदे परत घेतले आहेत. येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जरी हा निर्णय घेतला असला तरी या काळ्या कायद्यांमधील तरतुदी वेगवेगळ्या मार्गांनी अंमलात आणण्याचा प्रयत्न पुन्हा केंद्रसरकारने करू नये असा सल्लाही जयंत पाटील यांनी दिला आहे. तर दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री असलेले अजित पवार यांनी देखील नरेंद्र मोदी यांनी तिन्ही केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याचा घेतलेला निर्णय शेतकरी एकजुटीचा, महात्मा गांधीजींनी दाखवलेल्या अहिंसा, सत्याग्रहाच्या मार्गाचा विजय आहे. असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. योग्य निर्णयाबद्दल पंतप्रधान महोदयांचे आभार. शांततामय मार्गाने दिलेल्या प्रदीर्घ लढ्याबद्दल शेतकरी बांधवांचे अभिनंदन. शेतमालाला किमान आधारभूत दर देण्याचा कायदा केंद्र सरकारने करावा ही मागणीही लवकर मान्य व्हावी. लोकशाहीत लोकेच्छेचाच विजय होतो, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.” असे देखील अजित पवार म्हणाले.

देशाला संबोधित करताना मोदी काय म्हणाले?

“आमच्या सरकारनं शेतकऱ्यांच्या विकासासाठी तीन कृषी कायदे आणले होते. या कायद्यानं देशातील छोट्या शेतकऱ्यांना आणखी ताकद मिळावी होती. गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी होत होती. देशातील कृषी वैज्ञानिक, शेतकरी संघटना यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही प्रामाणिक हेतूनं शेतकऱ्यांच्या हितासाठी हे कृषी कायदे आणले होते. आमच्या सरकारनं शेतकऱ्यांना कृषी कायदे समजवण्यसाठी अर्थशास्त्रज्ञ आणि शेतकरी तज्ञ यांची देखील मदत घेतली होती. आणि हे कृषी कायदे समजावून सांगण्याचा सर्वप्रकरं आम्ही प्रयत्न केले. आम्ही शेतकऱ्यांना व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आम्ही ही गोष्ट शेतकऱ्यांना समजावून सांगू शकलो नाही.”

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

गोपीनाथ मुंडे अन् शरद पवार दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसानिमित्ताने परळीत बॅनरबाजी

News Desk

देशाची वाटचाल गुलामगिरीकडे- राहुल गांधी

News Desk

देशात लवकरच ई-पासपोर्ट जारी करणार, पंतप्रधान मोदींची माहिती

News Desk