HW News Marathi
मनोरंजन

नाट्यकर्मी हेमू अधिकारी यांचे निधन

मुंबई | ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेते डॉ. हेमू अधिकारी याचं दीर्घ आजाराने सोमवारी रात्री निधन झाले. मुंबईच्या शिवाजी पार्कमधील राहत्या घरी वयाच्या ८१ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये त्यांचा लीलया संचार होता.

हेमू अधिकारी हे प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवरील एक अग्रगण्य नाव आहे. ४५ नाटके, १६ मराठी आणि हिंदी चित्रपट आणि सात मालिकांमध्ये हेमू अधिकारी यांनी अभिनय केला होता. हेमू अधिकारी यांच्या पश्चात दोन कन्या आणि एक पुत्र असा परिवार आहे. डॉ. अधिकारी व्यवसायाने शास्त्रज्ञ होते. त्यांनी भाभा अणु संशोधन केंद्रामधून पदवी प्राप्त केली होती.

अभिनायाची मुळातच आवड असल्याने ते महाविद्यालयीन जीवनामध्ये नाट्यक्षेत्राशी जोडले गेले. ‘लगे रहो मुन्नाभाई’मधील त्यांची भूमिका रसिकांच्या मनात कायमची नोंदली गेली. अमोल पालेकर यांचे ‘जुलूस’ हे नाटक, ‘संध्याछाया’, ‘हसवाफसवी’, ‘ढोलताशे’ या नाटकांमध्ये त्यांनी लहानशा मात्र लक्षवेधी भूमिका केल्या. गेल्या वर्षी त्यांचे ‘नाट्य विज्ञान समाजेन’ हे पुस्तक प्रकाशित झाले. त्यांनी या पुस्तकात आपल्या आयुष्यातील काही निवडक आठवणी सांगितल्या आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

Ganesh Chaturthi 2018 | नानांच्या बाप्पाचे आगमन

News Desk

येशूंच्या जन्मदिनाचे महत्त्व…

News Desk

गणेशोत्सवानंतर मुंबईत येणाऱ्या चाकरमान्यांनी रत्नागिरी पॅसेंजर रोखली

swarit
देश / विदेश

कर्नाटकच्या जनतेचा काँग्रेस विरोधात कौल – अमित शहा

News Desk

नवी दिल्ली : कर्नाटकच्या जनतेने काँग्रेसच्या विरोधात कौल दिला असून काँग्रेसचे निम्म्याहून अधिक मंत्री पराभूत झाले. याच पराभवाचे काँग्रेसकडून सध्या सेलिब्रेशन सुरू आहे, असा टोला भाजपाचे अध्यक्ष अमित शहांनी काँग्रेसला मारला.आणीबाणी लागू करणाऱ्यांनी लोकशाहीच्या बाता मारु नयेत, अशा शब्दांमध्ये शहा यांनी काँग्रेसवर टीका केली. कर्नाटकमधील भाजपाचे सरकार अवघ्या ५५ तासांमध्ये कोसळल्यानंतर शहा यांनी प्रथमच पत्रकारांशी संवाद साधला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपाला सर्वाधिक १०४ जागा मिळाल्या. शनिवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने भाजपाला दिले होते. मात्र बहुमतासाठी आवश्यक आमदारांचा पाठिंबा नसल्याने येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. आता कर्नाटकमध्ये राज्यपालांनी काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेचे निमंत्रण दिलेय. काँग्रेस आणि जेडीएसच्या या निवडणुकीनंतरच्या युतीवर अमित शहांनी जोरदार टीका केली. काँग्रेस आणि जेडीएसची युती जनमताविरुद्ध असल्याचे शहा म्हणाले.

 

 

 

 

 

Related posts

अदानी समूह NDTV चे 29.18 टक्के शेअर्स खरेदी करणार

Aprna

सुशांतच्या मृतदेहाचे फोटोज व्हायरल, महाराष्ट्र सायबर सेलचा कडक इशारा

News Desk

अटल बिहारी वाजपेयी यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात

swarit