HW News Marathi
मनोरंजन

सिनेतारका मीनाकुमारीही होती तिहेरी तलाकची बळी!

मुंबई : तिहेरी तलाकच्या जुमली रुढीतून मुस्लीम महिलांची काल सर्वोच्च न्यायालयाने सुटका केली. त्यामुळे धडाडीच्या मुस्लीम महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. मात्र स्वातंत्र्यानंतर तब्बल सत्तर वर्षांनी हा न्याय मिळेपर्यंत अनेक मुस्लीम महिलांचे जीवन या अनिष्ट प्रथेमुळे भरडले गेले. सर्वसामान्य महिला तर त्याच्या बळी ठरल्याच, पण बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मीनाकुमारी हिचेसुद्धा आयुष्या तिहेरी तलाकने उद्ध्वस्त केले होते.

खूपच कमी काळात मीनाकुमारीला बॉलिवूडमध्ये सुपरस्टारचा दर्जा मिळाला होता. तिचे लग्न दिग्दर्शक कमाल अमरोही यांच्याबरोबर झाले होते. त्याकाळी लोक कमाल अमरोही यांनाही मीनाकुमारीचे पती या नावानेच अधिक ओळखायचे. याचाच परिणाम त्यांच्या वैवाहिक जीवनावरही झाला. मीनाकुमारीच्या यशामुळे कमाल यांनी तिचा छळ मांडला होता.

मीनाकुमारी ज्या चित्रपटांमध्ये काम करण्यास होकार देत होती, त्या चित्रपटाला कमाल विरोध करायचे. त्यामुळे दोघांमध्ये नेहमीच भाडणे, हाणामाऱ्या होत असत. मीनाकुमारीलामारहाण करणे नित्याचेच झाले होते. ती पतीमुळेखूपच त्रस्त झाली होती.

एक दिवस तर कमाल यांनी रागाच्या भरात मीनाकुमारीच्या श्रीमुखात मारताना तिला तीन वेळा ‘तलाक, तलाक, तलाक’ असे म्हटले. मीनाकुमारीसाठी ते अत्यंत अनपेक्षित आणि धक्कादायक होते. ती त्यांचा त्रास सहन करायची,परंतु तलाक घ्यावा, असा तिने कधी विचारहीकेला नव्हता. या तलाकमुळे तिला खूप मानसिक यातना सहन कराव्या लागल्या. पुढे पुढे या‘तलाक’च्या विचाराने ती नशेच्या आहारी गेली आणि त्यातच तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

नितेश राणेंकडून लालबागच्या राजाच्या कार्यकर्त्यांची पाठराखण

News Desk

Kumbh Mela 2019 : जाणून घ्या… कुंभमेळ्याचे धार्मिक महत्व

News Desk

आगमन बाप्पाचे | इको फ्रेंडली गणपती साजरा करण्यासाठी नाहर ग्रुप तर्फे दोनशे रहिवाशांना प्रोत्साहन

News Desk
Uncategorized

आता घाटी रुग्णालयात तीन बालकांचा मृत्यू

News Desk

औरंगाबाद-येथील घाटी रुग्णलायतील प्रसूती विभागात रविवारी रात्री तीन बालकांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली. मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी नातेवाईकांना गोरखपूर घटनेची आठवण झाली. मृत बेगमपुरा स्मशानभूमीत सोमवारी सकाळी सहा वाजता एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. ही विदारक घटना पाहून रोज सरणाची व्यवस्था करणाऱ्या स्मशानजोगीच्याही डोळ्यात पाणी आले.

रविवारी मृत्युमुखी पडलेल्या तीन बालकांत दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. माया मुकेश मगरे (३०, रा. ब्रिजवाडी), पूजा पांडुरंग बखले (रा. डोंगरगाव, ता. अंबड), अर्चना विनायक मुंढे (३०, रा. धावणी मोहल्ला) अशी मृत्युमुखी पडलेल्या नवजात शिशूंच्या आईची नावे आहेत. विनायक मुंढे (३६) त्याची पत्नी अर्चना हिला रविवारी सातच्या सुमारास अचानक कळा येऊ लागल्या. त्याने तिला तत्काळ घाटीतील प्रसूती विभागात दाखल केले. सात वाजून ४० मिनिटांनी अर्चना प्रसूत झाली. मात्र मुलगा झाला आहे की मुलगी हे त्याला कोणीच सांगितले नाही. पुरुषांना प्रसूती विभागात प्रवेश नसल्यामुळे त्याला बाहेरच थांबावे लागले. अखेर सकाळी सहा वाजता विनायकच्या हातात मृत बाळ ठेवण्यात आले. माझ्या बाळाचा मृत्यू कशामुळे झाला? असे तो घाटीतील कर्मचाऱ्यांना विचारत होता. मात्र, त्याला उत्तर मिळाले नाही. काही मुले जन्मल्यानंतर केवळ पंधार मिनिटे जगतात, असे डॉक्टरांनी सांगितले.

Related posts

पुण्यातील काही भाग पुर्णपेणे सील करण्याचा महापालिकेचा निर्णय

News Desk

जम्मू-काश्मीरमध्ये चकमक एक दहशतवादी ठार

News Desk

‘कुणाचाही घर-संसार उघड्यावर येऊ देणार नाही’, धनंजय मुंडेंचं आश्वासन!

News Desk